मुंबई- यांनी ८ जुलै रोजी त्यांचा ६२ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी सेलिब्रिटींसह अनेक चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. रणबीर आणि रिद्धीमा कपूर यांनी आईचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. यावेळी सिनेसृष्टीतील काही जवळचे मित्र- मैत्रिणीही उपस्थित होते. निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरी नितू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचला होता. नीतू यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले. यात त्यांच्यासोबत मुलगा रणबीर, मुलगी रिद्धीमा, नात, नणंड रीमा जैन आणि दिसत आहेत. या फोटोंना कॅप्शन देताना नीतू यांनी लिहिले की, 'मी या सर्व नात्यांसोबत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. आपल्या सर्वांना नेहमीच जवळच्यांचं प्रेम, पाठिंबा आणि ताकद हवी असते. आज मी सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याची जाणीव होत आहे.' सुशांतच्या मृत्यूनंतर ट्रोल होत आहे करण जोहर सुशांतच्या मृत्यूनंतर करणला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. सध्या करणने सोशल मीडियावर पोस्ट करणं बंद केलं आहे आणि तो बाहेरही पडत नाही. अशात नीतूच्या बर्थडे पार्टीत त्याला पाहून युझर्सने त्यावर पुन्हा राग काढायला सुरुवात केली. असंही म्हटलं जात होतं की गेल्या काही दिवसांपासून करण जोहर त्याला केल्या जाणाऱ्या ट्रोलपासून फार दुःखी आहे. या सर्व गोष्टींचा त्याला मानसिक त्रास होत आहे. नीतू कपूर यांच्या पार्टीमधील त्याचा फोटो पाहून युझर्सने याच गोष्टीवर कमेन्ट करायला सुरुवात केली. एका युझरने लिहिले की, 'मी कुठे तरी वाचलं होतं की करण जोहर दुःखात आहे. पण इथे मला तो चांगला दिसत आहे.' अजून एका युझरने या फोटोवर कमेन्ट केली की, 'मला केजोमती (करण जोहर) च्या चेहऱ्यावर दुःख अजिबात दिसत नाहीये.' तर दुसऱ्या युझरने लिहिलं की, 'करण जोहर जोरजोरात रडत असल्याचं सांगण्यात आलं होतं. इथे काही वेगळंच दिसतंय.' काही दिवसांपूर्वी करण जोहरचा जवळच्या मित्राने तो पूर्णपणे दुःखात असल्याचं सांगितलं होतं. सोशल मीडियावर त्याला ज्या पद्धतीने ट्रोल केलं जात आहे याचा त्याला त्रास होत असल्याचंही करणचा मित्र म्हणाला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/322rUTE