Full Width(True/False)

निधनाआधी सरोज खान यांनी सुशांतसाठी केली होती भावुक पोस्ट

मुंबई- बॉलिवूडकरांना २०२० या वर्षात अजून एक धक्का बसला आहे. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूमधून चाहते सावरत असतानाच त्यांना अजून एक धक्का बसला. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. गुरुवारी रात्री १ वाजून ५२ मिनिटांनी गुरुनानक इस्पितळात अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्टनुसार चारकोप येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सरोज यांची प्रकृती बिघडण्यापूर्वी त्यांनी अखेरची इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट सुशांतसिंह राजपूतच्या निधनासंबंधी होती. १४ जूनला शेअर केलेल्या या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्यांनी सुशांतच्या निधनावर दुःख व्यक्त केलं होतं. त्यांनी सुशांतचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, 'मला कधीही सुशांतसोबत काम करण्याची संधी मिळाली नाही. पण मी त्याला अनेकदा भेटले. तुझ्या आयुष्यात एवढं काय झालं की तू असा निर्णय घेतलास? तू एकदातरी मोठ्यांशी बोलला पाहिजे होता. त्यांनी तुला सांभाळलं असतं आणि तू आम्हाला नेहमीच हसवलं असतंस. तुझ्या जाण्यानंतर तुझ्या वडिलांचं आणि बहिणींचं काय झालं असेल याचा विचारही करवत नाही. मला तुझे सगळे सिनेमे आवडले. माझ्या मनात तू कायमच असशील.' सरोज खान यांनी बॉलिवूडमध्ये जवळपास ३ वर्ष काही काम केलं नव्हतं. २०२९ मध्ये 'कलंक' सिनेमात त्यांनी अखेरचं काम केलं. सरोज खान यांनी २ हजारांहून अधिक गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन केलं होतं. त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होती. संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास'मधील 'डोला रे डोला', माधुरी दीक्षितच्या 'तेजाब' सिनेमातील 'एक दो तीन' आणि २००७ मध्ये आलेल्या 'जब वी मेट' सिनेमातील 'ये इश्क हाए' या गाण्यांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यानंतर त्यांनी काम करणं कमी केलं होतं. ८० च्या दशकात त्यांनी श्रीदेवी यांच्या सिनेमांसाठी नृत्यदिग्दर्शन केलं होतं. 'मैं नागिन तू सपेरा' आणि 'हवा हवाई' ही त्यांची गाणी विशेष गाजली. कंगना रणौतच्या मणिकर्णिकी सिनेमात त्यांनी काम केलं. तसेच २०१५ मध्ये आलेल्या 'तनू वेड्स मनू रिटर्न' सिनेमासाठीही त्यांनी नृत्यदिग्दर्शन केलं होतं. तसेच गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'कलंक' सिनेमात त्यांनी माधुरी दीक्षितसोबत अखेरचं काम केलं. करण जोहरची निर्मिती असलेल्या 'कलंक' सिनेमात सरोज खान यांनी 'तबाह हो गये' हे गाणं नृत्य दिग्दर्शित केलं होतं. या गाण्यावर माधुरी दीक्षितने ठेका धरला होता. २२ नोव्हेंबर १९४८ रोजी त्यांचा जन्म झाला होता. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून त्यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्यांना लहानपणापासून नृत्याची आवड होती. विशेष म्हणजे त्यांनी नृत्याचं कोणतंही शिक्षण घेतलं नव्हतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YRM2Ga