मुंबई: कानपूरच्या बिकरू गावात ८ पोलिसांची हत्या केल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून फरारी असलेला कुख्यात याला अखेर अटक ( arrested) करण्यात आली आहे. उज्जैनमधील महाकाल मंदिरातून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. मंदिराच्या सुरक्षा यंत्रणेने त्याला ताब्यात घेतले आहे. यानंतर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण मात्र सुरुच आहे. असं असताना बॉलिवूडच्या निर्मात्यानं मात्र, विकास दुबेच्या अटकेचं सर्व श्रेय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांना असल्याचं म्हटलं आहे. विकास दुबेच्या अटकेसंदर्भात बॉलिवूड निर्माते यांनी एक ट्विट केलं आहे. ' उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामुळं आज विकास दुबे सारखे कुख्यात गुंड बिळातून बाहेर येत असून योगीजींनी गुन्हेगांसाठी भीतीचं वातावरण निर्माण केल्याचा हा परिणाम. अटक आहे की तो शरण आलाय हे सांगू शकत नाही. पण योगीजींच्या भीतीमुळंच हे शक्य झालं', असं पंडित यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. कानपूरच्या चौबेपूर येथे पोलिसांची हत्या केल्यानंतर विकास दुबे फरार झाला. प्रथम तो दिल्ली-एनसीआर येथे पोहोचला. मात्र पोलिसांच्या भीतीपोटी तो मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात पोहोचला. तेथे महाकाल मंदिराबाहेर पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी गँगस्टर विकास दुबेला मंगळवारी दिल्लीजवळील हरयाणा येथील फरीदाबादमध्ये एका हॉटेलात पाहिले गेले होते. मात्र पोलिसांनी या हॉटेलवर छापा मारण्यापूर्वी तो तेथून पसार झाला होता. कोण आहे विकास दुबे? २००० साली कानपूरच्या शिवली ठाण्याच्या हद्दीतील ताराचंद इंटर कॉलेजचे सहायक व्यवस्थापक सिद्धेश्वर पांडेय यांच्या हत्याप्रकरणातही विकास दुबेचं नाव समोर आलं होतं. याच वर्षी त्याच्यावर रामबाबू यादवच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप झाला होता. हा कट त्याने तुरुंगात बसून रचला होता. २००४ मध्ये एका केबल व्यावसायिकाचीही हत्या झाली होती. त्यातही याचं नाव समोर आले होते. २०१३ मध्येही अनेक घटनांमध्ये विकास दुबे याचे नाव समोर आले होते. २०१८ मध्ये तुरुंगात असूनही त्याने चुलत भाऊ अनुराग याच्यावर हल्ला घडवून आणला होता. अनुरागच्या पत्नीने विकाससह चार जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. विकास दुबेविरोधात तब्बल ६० गंभीर गुन्हे दाखल आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38EZDnz