Full Width(True/False)

भाजप नेते राम कदमांच्या ट्वीटवर कंगनाची प्रतिक्रिया होतेय व्हायरल

मनाली- काही दिवसांपूर्वी कंगना रणौतने ट्वीट करून खुलासा केला होता की ती बॉलिवूडमधील ड्रग्ज माफिया टोळीचा खुलासा करू शकते. पण यासाठी तिला संरक्षणाची गरज आहे. याचमुद्द्यावर बोलताना भाजप नेते म्हणाले की, कंगनाने ट्वीट करून चार दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला आहे, पण महाराष्ट्र सरकारने तिला अजूनही संरक्षण दिलेलं नाही. कंगनाने यावर उत्तर देताना म्हटलं की, तिला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती वाटते. महाराष्ट्र सरकार घाबरतंय का? राम कदम यांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘१०० तास आणि चार दिवसांपेक्षा जास्तीचा काळ लोटून गेला. कंगना स्वतः बॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांबद्दल सांगायला तयार आहे. पण यासाठी तिला सुरक्षेची गरज आहे. पण महाराष्ट्र सरकारने तिला अजून संरक्षण दिलं नाहीये. कदम यांनी आपल्या पत्रात लिहिलं की, महाराष्ट्र सरकारलाच या खुलाशांची भीती वाटते? त्यांचेच लोक या गोष्टी लपवत आहेत? माफियांपेक्षा मुंबई पोलिसांचीच जास्त भीती यावर उत्तर देताना कंगनाने ट्वीट करत लिहिले की, ‘तुम्ही दाखवलेल्या काळजीबद्दल मी तुमची आभारी आहे. पण मला बॉलिवूड माफिया, गुंडांपेक्षा आता मुंबई पोलिसांचीच भीती वाटत आहे. मला एक तर हिमाचल प्रदेश सरकारकडून किंवा थेट केंद्राकडून सुरक्षा हवी आहे. मुंबई नको.’ कंगना म्हणाली तिला करायची आहे मदत दरम्यान, यापूर्वी सुशांतलिंह राजपूत प्रकरणात काही ड्रग्ज चॅट व्हायरल झाले होते. यावरून रिया चक्रवर्ती ड्रग्ज डीलिंगमध्ये असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, बॉलिवूड आणि ड्रग्जचा घनिष्ठ संबंध असल्याचं कंगनाने सांगितलं होतं. बॉलिवूड पार्ट्यांमध्ये कोकेन ततर हमखास उपलब्ध असतं. याचसोबत तिने ट्वीट करत सांगितलं होतं की, तिला नारकोटिक्स ब्युरोची मदत करायची आहे पण त्यासाठी तिला संरक्षणाची गरज आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QFGHNi