मुंबई: बॉलिवूड अभिनेता याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून तो आता घरी परतला आहे. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने दोन दिवसांपूर्वी संजयला वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. संजय दत्तच्या शरिरात ऑक्सिजचं प्रमाण कमी होत असल्यानं त्याला श्वास घेण्यास काहीसा त्रास होत होता. त्यामुळं ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर संजय दत्तची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली होती. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर संजय दत्तचा स्वॅब घेऊन तो करोना चाचणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल देखील निगेटिव्ह आल्यानं त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. बॉलीवूडमध्ये करोनाने शिरकाव केल्यानंतर सर्वात मोठा हादरा ठरला तो म्हणजे बच्चन कुटुंबाला पडलेला करोनाचा विळखा. महानायक अमिताभ बच्चन, पुत्र अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन, नात आराध्या अशा चार जणांना करोनाची लागण झाल्याने सगळेच हादरले. बच्चन यांचे चारही बंगले खबरदारी म्हणून सील करण्यात आले होते. अमिताभ बच्चन यांनी आयुष्यात अनेक संकटे झेलली. त्याच हिमतीने त्यांनी करोनाशीही दोन हात केले. त्या जोरावर अमिताभ करोनामुक्त होऊन घरी परतले. त्याआधी ऐश्वर्या व आराध्याही करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले. मुख्य म्हणजे तब्बल २८ दिवसांनंतर आजच अभिषेक बच्चनला नानावटी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. अभिषेकचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. या पार्श्वभूमीवर संजय दत्त रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याचे चाहतेही चिंतेत पडले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30KuWLj