मनाली- कंगना रणौतच्या मुंबई कार्यालयावर बीएमसीने केलेल्या कारवाईवर सर्वत्र टीका होत आहे. शिवसेनेच्या धमकीनंतर कंगना व्हाय प्लस सुरक्षेसह मुंबईत आली. कारवाईनंतर, जेथे महापालिकाला न्यायालयाची पायरी चढावी लागली. तिथे राजकीय वर्तुळातही शिवसेनेची मोठ्या प्रमाणावर निंदा केली जात आहे. या सगळ्यात पहिल्यांदाच कंगनाच्या आई आशा रणौत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कंगनाचा त्यांना अभिमान असल्याचं म्हटलं. इतकंच नव्हे तर आशा रणौत म्हणाल्या की आम्ही सुरुवातीपासूनच कॉंग्रेसी होतो. पण अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमची साथ दिली. त्यांनी आमच्या मुलीला संरक्षण दिलं. 'मुलीचा अभिमान आहे, नेहमी सत्याच्या बाजूने राहते उभी' कंगनाची आई आशा रणौत म्हणाल्या, 'संपूर्ण भारतीयांच्या प्रार्थना कंगनासोबत आहेत. मला माझ्या मुलीचा अभिमान आहे की ती नेहमी सत्याच्या बाजूने उभी असते. आम्ही केंद्र सरकार, आणि अमित शहा यांचे आभार मानतो ज्यांनी माझ्या मुलीचं रक्षण केलं. कंगनाला सुरक्षा दिल्याबद्दल अमित शहाजींचे आभार, जर तिला संरक्षण दिलं गेलं नसतं तर मग तिचं काय झालं असतं माहात नाही.' 'आम्ही सुरुवातीपासूनच कॉंग्रेस पक्षाला मानणारे होतो, पण ...' कंगनाची आई पुढे म्हणाली, 'आम्ही सुरुवातीपासूनच कॉंग्रेससोबत होतो. आमचे आजोबासुद्धा सुरुवातीपासूनच कॉंग्रेसी होते. पण नंतर आम्हाला पाठिंबा मिळाला तो कोणाचा यांचा. त्यांनी आमच्या मुलीला पाठिंबा दिला. मी माझ्या मुलीसाठी दररोज प्रार्थना करते.' कंगनाच्या आईने आशा देवी यांनी यावेळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचेही आभार मानले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hoUjap