Full Width(True/False)

बहीण मीतूने सांगितलं ८ ते १४ मध्ये नक्की काय झालं होतं

मुंबई-सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू नक्की कसा झाला याचा शोध सीबीआयची टीम घेत आहे. या संदर्भात आतापर्यंत बर्‍याच जणांची चौकशी केली गेली. सुशांतची बहीण राणी, प्रियांका आणि मितू यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. सीबीआयने नव्याने साऱ्यांचे जबाब नोंदवून घेतले. दरम्यान आता सुशांतची बहीण मितू सिंहचा जबाब समोर आला आहे. मितून ८ ते १४ जून दरम्यान नक्की काय घडलं याचा तपशील दिला आहे. ८ जूनला सुशांतचा आला फोन इंडिया टूडेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मीतूने सांगितलं की, '८ जूनला सकाळी सुशांतने मला फोन केला आणि भेटण्यासाठी बोलावलं. संध्याकाळी ५.३० वाजता मी सुशांतच्या घरी पोहोचले. मी जेव्हा त्याला भेटायला गेले तेव्हा तो शांत होता. मी काय झालं असं त्याला विचारलं तेव्हा त्याने लॉकडाउनमुळे कंटाळा आल्याचं सांगितलं. लॉकडाउन संपल्यानंतर तो दक्षिण भारतात जाईल असंही त्याने सांगितलं.' लॉकडाउननंतर फिरण्याचं नियोजन त्याने मला काही दिवस त्याच्याबरोबर रहायला सांगितलं. मी काही दिवस थांबलेही. सुशांतसोबत असताना मी स्वतः जेवण करायचे, त्याच्याशी चर्चा करायची आणि लॉकडाउननंतर दक्षिण भारतात जाण्याचीही आम्ही चर्चा करायचो. १२ आणि १४ जूनला सुशांतने केला नाही मेसेज १२ जूनला माझी मुलगी गोरेगावला एकटी होती. संध्याकाळी ४.३० नंतर मी माझ्या घरी परत गेले. घरी पोहोचल्यावर मी सुशांतसिंग राजपूतला मेसेज केला. पण त्याने माझ्या मेसेजला उत्तर दिलं नाही. फोनही केला नाही. १४ जून रोजी १०.३० वाजता मी सुशांतला फोन केला पण त्याने माझा फोन उचलला नाही. म्हणून मी त्याच्याबरोबर राहणाऱ्या सिद्धार्थ पिठाणीला फोन केला. आतून दार बंद होते सिद्धार्थनं सांगितलं की त्याने सुशांतला नारळ पाणी आणि डाळिंबाचा रस दिला आहे. कदाचित तो झोपला असेल. त्यांनी दरवाजा ठोठावला पण दार आतून लॉक होतं. यावेळी मी सांंगितलं की, सुशांत कधीही आतून दरवाजा बंद करत नाही. मी पुन्हा दार ठोठावण्यास सांगितलं. यासोबतच सुशांतला मी फोन केला होता असा निरोप द्यायलाही सांगितलं. घरी पोहोचले तेव्हा बेडवर होता सुशांत थोड्या वेळाने सिद्धार्थचा परत फोन आला त्याने सांगितलं की, सुशांतचा दरवाजा अनेकवेळा ठोठावला. पण तरीही तो दरवाजा उघडत नाहीये. तो चावीवाल्याला बोलवत असल्याचंही म्हणाला. सिद्धार्थच्या फोननंतर मी लगेच कॅब करून सुशांतच्या घरी जायला निघाले. टॅक्सीत असताना सिद्धार्थचा पुन्हा फोन आला तेव्हा त्याने सुशांतने स्वतःला पंख्याला लटकवून घेतल्याचं सांगितलं. मी जेव्हा घरी पोहोचले तेव्हा सुशांतला पलंगावर ठेवले होते आणि हिरवा कुर्ता छताच्या पंख्याला लटकलेला होता. मी बहिणी नीतू आणि प्रियांकाला माहिती दिली सिद्धार्थ आणि घरातील इतर कर्मचाऱ्यांनी चाकूने कुर्ता फाडून सुशांतचा मृतदेह खाली घेतला होता. वांद्रे पोलीस ठाण्यातील पोलिसांना आणि इतर लोकांनाही त्यानेच बोलावले. या घटनेची माहिती मी माझ्या बहिणी नीतू आणि प्रियांकाला दिली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34Z5nso