मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून खडाजंगी होताना दिसत आहे. सुशांतसिंह राजपूतसाठी आवाज उठवणाऱ्या कंगनाने पीओकेसारखी वाटत असल्याचं बोलली होती. यानंतर शिवसेनेतील अनेक नेत्यांनी कंगनाला माफी मागण्यास सांगितले. दरम्यानच्या काळात, बीएमसीने कंगनाच्या कार्यालयात बेकायदेशीर बांधकाम झाल्याचा हवाला देऊन कार्यालयाची तोडफोड केली. यावर कंगनाने थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. 'मला माझ्या मुलीचा अभिमान आहे' आता कंगनाची आई आशा राणौत यांनी नुकत्याच घडलेल्या घटनांवर प्रतिक्रिया दिली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या की, 'माझ्या मुलीला सत्य बोलल्याची शिक्षा मिळत आहे. ती गेली १६ वर्षे महाराष्ट्रात आहे आणि तिने काहीही चूक केली नाही. मला माझ्या मुलीचा अभिमान आहे की ती नेहमी सत्याच्या बाजूने उभी राहते. जर तिला काही चुकीचं दिसत असेल तर ती मला विचारते आणि मी तिला योग्य- अयोग्यबद्दलचा सल्ला देते.' 'आम्ही सुरुवातीपासूनच कॉंग्रेस पक्षाला मानणारे होतो, पण ...' कंगनाची आई पुढे म्हणाली, 'आम्ही सुरुवातीपासूनच कॉंग्रेससोबत होतो. आमचे आजोबासुद्धा सुरुवातीपासूनच कॉंग्रेसी होते. पण नंतर आम्हाला पाठिंबा मिळाला तो कोणाचा अमित शाह यांचा. भाजपने आमच्या मुलीला पाठिंबा दिला. मी माझ्या मुलीसाठी दररोज प्रार्थना करते.' कंगनाच्या आईने आशा देवी यांनी यावेळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचेही आभार मानले. 'ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेच नाही' महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष शिवसेनेवरही कंगनाच्या आईने टीका केली. त्या म्हणाल्या की, 'जर कंगना चुकीची असती तर देशातील लोक तिचं समर्थन करणार नाहीत. हे कसलं सरकार आहे.. ज्या शिवसेनेबद्दल आम्ही अनेक वर्ष ऐकत होतो ही बाळासाहेब ठाकरेंची नाही. ही शिवसेना भेकड आहे. माझ्या मुलीने १५ वर्ष कठोर परिश्रम केले आणि कार्यालय उभारण्यासाठी पैसे जोडले होते. आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातील आहोत. त्यांच्याकडे (शिवसेना) त्यांच्या आई- वडिलांची मालमत्ता आहे, ज्यावर ते बढाई मारतात आणि इतका अन्याय करतात.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ReubVp