Full Width(True/False)

मुंबई मेरी जान! कंगना पडली एकटी, मुंबईसाठी एकवटले सेलिब्रिटी

मुंबई- एकीकडे सीबीआय सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी करत असताना दुसरीकडे इतर सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांची मतं देत आहेत. सुशांतच्या मृत्यूच्या दिवसापासून अभिनेत्री काही ना काही वक्तव्य करत आहे. घराणेशाही, गटबाजी, माफिया यांसारख्या अनेक विषयांवर कंगनाने आपलं मत मांडलं आहे. फक्त कंगनाच नाही तर शिवसेना नेते यांनीही यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने एका वक्तव्यात स्पष्ट म्हटलं होतं की तिला आता मुंबई पोलिसांची भीती वाटते. तिच्या या वक्तव्यावर राऊतांनीही तिला मुंबईत परत न येण्याचा सल्ला दिला. मुंबईत रहायला जर कंगना घाबरत असेल तर तिने परत येऊ नये असं संजय राऊत म्हणाले होते. यावर कंगना असं काही म्हणाली की आता बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. कंगना रणौतच्या वतीने ट्वीट करण्यात आले होते. यात तिने लिहिले की, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघडपणे धमकी दिली असून मी पुन्हा मुंबईत येऊ नये, असं त्यांनी म्हटलं आहे. आधी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याचा नारा लागला आणि आता उघडपणे धमकी दिली जात आहे. ही मुंबई आता पाकिस्तान व्याप्त काश्मीर (पीओके) सारखी का दिसत आहे? कंगनाच्या या वक्तव्याने मोठा गदारोळ झाला. तिची मोठ्या प्रमाणात निंदा करण्यात आली. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आपलं मत दिलं. अभिनेत्री स्वरा भास्करने ट्वीट करत मुंबई पोलिसांचं समर्थन केलं. सुशांत प्रकरणात यापूर्वी बोलणार्‍या स्वराने लिहिलं की, 'एक बाहेरच्या राज्यातील नागरिक म्हणून, स्वतंत्र काम करणारी महिला आणि जवळपास १० वर्ष मुंबईत राहत असलेली एक नागरिक म्हणून मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्या शहरामध्ये आपण काम करू शकतो आणि सुरक्षित राहू शकता अशा शहरांमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित आणि सोप्पं शहर आहे. मुंबईला सुरक्षित ठेवणाऱ्या मुंबई पोलिसांचे यासाठी आभार.' स्वरा भास्करशिवाय आणि यांनीही ट्वीट करुन मुंबईबद्दलचं प्रेम व्यक्त केलं. रितेशने लिहिलं की, 'मुंबई हिंदुस्थान आहे.' तर सोनूने लिहिलं की, 'मुंबई... हे शहर नशीब बदलवतं. आदर केल्यास आदर मिळेल.' या दोघांव्यतिरिक्त ट्विटरवरील सर्व वापरकर्त्यांनीही मुंबईबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32Va7gb