Full Width(True/False)

संजय दत्तची कॅन्सरवर मात, आयुष्याची लढाई जिंकत मन केलं मोकळं

मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचं कुटुंब आणि चाहते त्याच्या प्रकृतीबद्दल चिंताग्रस्त होते. संजयला फुफ्फुसांचा झाल्याचं निदान झालं होतं. पण आता संजय कर्करोगमुक्त झाला असल्याचं त्याने स्वतः सांगितलं आहे. संजयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना ही बातमी दिली. संजय दत्तने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये संजयने लिहिले की, 'आज तुम्हा सर्वांसोबत ही बातमी शेअर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. माझं मन कृतज्ञतेने भरलं आहे. धन्यवाद.' संजय दत्तने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'गेले काही महिने माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. असं म्हणतात की देव बलवान सैनिकाचीच सर्वात कठीण परीक्षा घेतो. आज, माझ्या मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी ही लढाई जिंकून परत आलो हे सांगायला आनंद होत आहे. मी माझ्या मुलांना आणि कुटुंबाला याहून चांगलं गिफ्ट दुसरं काही देऊ शकलो नसतो. तुमचा विश्वास आणि पाठबळाशिवाय हे सर्व शक्य झालं नसतं. मी माझ्या कुटुंबाचे, मित्रांचे आणि त्या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार मानतो जे या कठीण काळात माझ्या पाठीशी उभे राहिले आणि माझी ताकद झालात. मला भरभरून प्रेम आणि असंख्य आशीर्वाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार. ' दरम्यान, ऑगस्ट महिन्यात संजय दत्तने सोशल मीडियावर त्याच्या तब्येतीची माहिती देत कामातून काही महिने ब्रेक घेणार असल्याचं सांगितलं होतं. यानंतर संजयला कर्करोग झाल्याचं कळलं. त्याचं मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात केमोथेरपी झाल्या. यानंतर संजयने त्याच्या आगामी 'शमशेरा' आणि 'केजीएफ: चॅप्टर २' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Tf4GUQ