Full Width(True/False)

अर्णब यांच्या सुटकेनंतर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचं खास ट्विट

मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे संपादक यांना सुप्रीम कोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांची तात्काळ सुटका करण्याचा आदेशही दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांच्या समर्थकांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले आहेत. यात अनेक सेलिब्रिटींचा देखील समावेळ आहे. अर्णब यांच्या सुटकेनंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. ज्येष्ठ अभिनेते यांनी अर्णब यांना जामीन मंजूर झाल्यानंतर खास ट्विट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तो परत आला! जय हो.. असं ट्विट अनुपम यांनी केलं आहे. अनुपम यांनी अर्णब यांचं नाव ट्विट मध्ये लिहिलं नसलं तरी हे खास ट्विट त्यांनी अर्णबसाठीचं केल्याचं स्पष्ट आहे. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी मागील आठवड्यात रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती. अर्णब यांच्या अटकेनंतर भाजपनं राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. केंद्रातील भाजप नेत्यांनीही अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध व्यक्त करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. उच्च न्यायालयानंही अर्णब यांना तातडीने जामीन नाकारला होता. त्यानंतर अर्णब यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eObN0o