Full Width(True/False)

मामा-भाच्यातलं वैर संपेना; कपिलच्या शोमध्ये गोविंदा आल्यानं कृष्णाची गैरहजेरी!

मुंबई: टीव्हीवरचा लोकप्रिय कॉमेडी शो ''मध्ये नुकत्याच एका भागामध्ये अभिनेते यांनी हजेरी लावली होती. मात्र या भागात शोचा सध्याचा हुकुमी एक्का मानला जाणारा कॉमेडियन गायब होता. याचं कारण मामा-भाच्यातलं वैर आहे . कृष्णाचे मामा गोविंदाबरोबरचे संबंध बिघडले आहेत. त्यामुळे त्यानं गैरहजर राहणं पसंत केलं. गेल्या वर्षी देखील कपिलच्या याच शोमध्ये गोविंदा यांनी त्यांच्या मुलीसोबत हजेरी लावली होती, त्यावेळी देखील कृष्णानं सेटवर न येणंच पसंत केलं होतं. यंदा मात्र त्यांच्यातील हा वाद संपून या शोच्या माध्यमातून नवीन सुरुवात होईल, असं सर्वांनाच वाटत होतं. मात्र कृष्णानं गोविंदा स्पेशल एपिसोडमध्ये एन्ट्रीच घेतली नाही, तौ गैरहजर राहिला. त्यामुळं गोविंदा आणि यांच्यातला वाद अद्यापही संपला नाहीए, हेच दिसून आलं. त्यांच्यात नेमकं काय बिनसलंय हे मात्र कुणी सांगायला तयार नाही. गोविंदा यांना कपिलच्या शोमध्ये धक्काल उडवून दिल्याचं पाहायला मिळतंय. ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटाच्या ‘किसी डिस्को मे जाए’ या गाण्यावर गोविंदा यांनी डान्स केला. परंतु कृष्णाची उणीव मात्र, नक्कीच जाणवत होती. म्हणून आलाय नात्यात दुरावा?गोविंदा आणि कृष्णा यांच्या नात्यात दुरावा येण्याचं कारण कृष्णाची पत्नी कश्मिरा शहा हिनं केलेलं एक ट्विट ठरलं, असं म्हटलं जात आहे. कश्मिरानं एकदा ‘काही लोक पैशासाठी नाचतात’असं ट्विट केलं होतं. गोविंदा यांच्या पत्नी सुनीता हिला काही हे ट्विट कश्मिरा हिनं गोविंदा यांना उद्देशून लिहिलं होतं, असं वाटलं. तेव्हापासून या दोन्ही कुटुंबात दुरावा निर्माण झाला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3pzQvZu