Full Width(True/False)

दोन वेळा घटस्फोट, लिव्हइन रिलेशनशिप... असं आहे कमल हसन यांचं खासगी आयुष्य

मुंबई: दाक्षिणात्य सुपरस्टार यांचा आज वाढदिवस. कमल हसन याचं फिल्मी करिअर आणि राजकीय करिअर देखील नेहमीच चर्चेत असंत. अनेक चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मनं जिंकली आहे. असं असताना राजकारणासाठी फिल्मी करिअरला दूर ठेवण्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यांचा हा निर्णय त्यांची लेकी अक्षरा आणि श्रुती यांना मान्य नव्हता. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर चित्रपटांना रामराम ठोकण्याच्या दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन यांच्या निर्णयावर त्यांच्या मुली अभिनेत्री व प्रचंड नाराज झाल्या होत्या. त्यांनी आपली नाराजी वडिलांकडं बोलून दाखवलीही होती. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूनंतर राज्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली होती. ही संधी साधून कमल हसन यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. तसंच, पक्षाची स्थापनाही केली आहे. राजकारणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी भविष्यात चित्रपटांपासून लांब राहण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला होता. पण श्रुती आणि अक्षरा यांना वडिलांचा हा निर्णय पटला नाही. त्यांनी यावर पुनर्विचार करण्याचा सल्ला वडिलांना दिला होता. मात्र, कमल हसन यांनी दोघींना त्यांचा निर्णय पटवून दिला. त्यामुळं आता त्यांची नाराजी दूर झाली असून राजकीय प्रवासात वडिलांना भक्कम साथ देण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. असं आहे कमल हसन यांचं आयुष्य!आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटांचा सामना करत, अथक परिश्रमांनी कमल हसम यांनी स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. ते उत्कृष्ट अभिनेते तर आहेतच शिवाय ते उत्तम दिग्दर्शक, लेखक, गायकही आहेत. त्यांनी भरतनाट्यमचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलं आहे. १९७८ मध्ये हासन यांनी वाणी गणपती यांच्याशी विवाह केला. वाणी या कमल यांच्यापेक्षा २४ वर्षांनी मोठ्या होत्या. १० वर्षांच्या संसारानंतर त्यांनी १९८८ मध्ये घटस्फोट घेतला. याच काळात ठाकूर आणि कमल हासन यांची भेट झाली. सारिकामुळे कमल यांचं लग्न मोडलं असंही म्हटलं जातं. कमल आणि सारिका एकमेकांना डेट करू लागले. दरम्यानच्या काळात सारिका गरोदर राहिल्या. ही गोष्ट जेव्हा वाणी यांना कळली तेव्हा त्यांनी कमल यांना घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर त्याचवर्षी कमल यांनी सारिकाशी लग्न केलं. लग्नानंतर सारिकाने पहिल्या मुलीला श्रुती हासनला जन्म दिला. लग्नानंतर सारिका यांना सिनेमांमध्ये फार काम केलं नाही. १९९१ मध्ये दोघांना अजून एक मुलगी झाली. .. सुखी संसारात तेव्हा वादळ आलं जेव्हा कमल त्यांच्याहून २२ वर्ष लहान सिमरन बग्गाला डेट करू लागले. सारिकाला ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी २००४ मध्ये कमल यांना घटस्फोट दिला. मात्र याबद्दल कळताच सिमरन यांनी त्यांच्या लहानपणीच्या मित्राशी लग्न केलं. यानंतर कमल पूर्णपणे एकटे पडले. अनेक वर्षांनंतर त्यांची ओळख गौतमी तडीमल्लाशी झाली. १२ वर्ष दोघं लिव्ह- इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र नात्यात भांडणं होऊ लागली तेव्हा गौतमी यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले होते की, 'वेगळं होण्याचा निर्णय घेणं सोप्पं नव्हतं. पण स्वप्नांना तिरांजली वाहणंही कठीण होतं.' यासोबतच त्यांना कोणाचीही सहानूभूती नको असल्याचं सांगितलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2IcRw8o