Full Width(True/False)

बॉलिवूड पदार्पणासाठी दिया मिर्झाच्या पालकांचा होता नकार; 'या' अभिनेत्यानं घातली होती पालकांची समजूत

मुंबई : अभिनेत्री हिला बॉलिवूडमध्ये येऊन तिला नुकतीच १९ वर्षं पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं दियानं आपल्या जुन्या आठवणींना उजळा दिला . ‘मिस इंडिया’चा किताब पटकावल्यानंतर लगेचच तिला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. पण, तिचे पालक तिला बॉलिवूडमध्ये जाऊ देण्यास बिलकूल इच्छुक नव्हते. तेव्हा अभिनेते यांनी दियाच्या पालकांची समजूत घातली. बॉलिवूड ही काम करण्यासाठी इतकी वाईट जागा नाहीय, असं त्यांनी तिच्या पालकांना समजावून सांगितल्यावर दियाच्या पालकांनी तिला कशीबशी परवानगी दिली होती, अशी आठवण तिनं सांगितली. मॉडेलिंगमधील यशस्वी करिअरनंतर तिनं बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. आर माधवनबरोबर तिनं ‘’ या सिनेमातून तिनं हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. हा चित्रपट पाहून दियाचे आई-वडील खूश झाले होते. हा चित्रपट थिएटरमध्ये फार कमाई करू शकला नाही. पण, एक रोमँटिक चित्रपट म्हणून त्यानं लोकप्रियता मिळवली. दियाचं वय तेव्हा खूप कमी होतं. ती कामानिमित्त हैदराबाद ते मुंबई ये-जा करीत असे. दियानं १९ व्या वर्षी मुंबईत स्वत:चं घर खरेदी केलं. त्यानंतर तिनं अनेक छोटे-मोठे चित्रपट केले. ‘दिवानापन’, ‘’, ‘’, ‘दस’, ‘संजू’, ‘थप्पड’ यासारख्या चित्रपटांत ती झळकली. पण, इंडस्ट्रीतला हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता, असं दिया सांगते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Xnqqjc