Full Width(True/False)

नवं वळण- 'काय घडलं त्या रात्री' मध्ये होणार संजय जाधवची एण्ट्री

मुंबई- आपल्या समाजात अनेक लोक राहत असतात पण याच समाजात अशी काही प्रतिष्टीत मंडळी अशी असतात ज्यांच्या हालचालींवर प्रत्येकाचं लक्षं असतं. अशी एक सुप्रसिद्ध प्रतिष्ठीत व्यक्ती जेव्हा आत्महत्या करते तेव्हा एक गूढ रहस्य मागे सोडून जाते. या मालिकेतही काहीसं असंच पाहायला मिळत आहे. मालिकेत पोलिसांच्या हाती लागलेले पुरावे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं स्पष्ट करतात आणि तपासाला एक नवं वळणं मिळतं. आता ही मालिका एका वेगळ्या वळणावर आली आहे. कारण ‘अॅडवोकेट विश्वजित चंद्रा आणि एसीपी रेवती बोरकर समोरा समोर येणार आहेत. विश्वजित हा दुसरा तिसरा कोणी नसून रेवतीचा नवरा असतो. अत्यंत श्रीमंत आणि नामवंत वकील म्हणून त्याची समाजात ओळख आहे. संजनाच्या मदतीने छायाचे वडील लोकांपुढे आर्थिक मदतीची याचना करतात. ज्यातून पाच लाख जमा होतात. हवालदार ढवळे राजनला त्याच्या अटकेची रेवती तयारी करत असल्याचं सांगतो. मिळालेल्या माहितीमुळे राजन सावध होतो आणि संजनाच्या घरी जाऊन संजनाला धमकावतो. संजनाच्या घरी काम करणारी करिना हे पाहून घाबरते. ढवळे राजनला बातम्या पोहोचवत असल्याचं करिना रेवतीला फोन करून कळवते. राजन स्वत:साठी शहरातील सर्वोत्तम वकील म्हणून विश्वजीतशी संपर्क साधतो. आता न्यायप्रिय रेवती आणि कायदेतज्ज्ञ विश्वजित समोरासमोर येणार तेव्हा नक्की काय घडणार आणि या मृत्यूमागचं गूढ सत्य समोर येईल का हे पाहणं औत्सुक्याचं असेल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2MzSn5k