मुंबई: बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांमध्ये गणल्या जाणाऱ्या यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. भन्साळी यांनी त्यांच्या करिअरच्या काळात सलमान खानसोबत 'खामोशी: द म्युझिकल', 'हम दिल दे चुके सनम' आणि 'सांवरिया' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यातील 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटाला तर आजही प्रेक्षकांच्या पसंती आहे. पण एक असाही काळ होता जेव्हा सलमान आणि भन्साळी यांना मैत्रीत गैरसमज झाले होते आणि दुरावा सुद्धा आला होता. संजय लीला भन्साळी यांचा 'हम दिल दे चुके सनम' चित्रपट जगभरात ब्लॉकबस्टर ठरला होता. संजय लीला भन्साळी यांना ऐश्वर्या-सलमानची जोडी खूप आवडली होती. 'हम दिल दे चुके सनम'च्या यशानंतर संजय लीला भन्साळी यांनी या दोघांसोबत 'बाजीराव मस्तानी' करण्याचा निर्णय घेतला होता. पण काही काळातच सलमान ऐश्वर्याचं नातं तुटलं आणि ते वेगळे झाले. त्यानंतर ऐश्वर्यानं सलमानसोबत काम करण्यास नकार दिला. सलमानला भन्साळी यांची कथा आवडली होती. त्यामळे त्यानं भन्साळी यांना मस्तानीच्या व्यक्तिरेखेसाठी करिना कपूरचं नाव सुचवलं होतं. पण आपली स्क्रिप्ट, सीन आणि कास्टसाठी आग्रही असणाऱ्या भन्साळींनी करिनाला या व्यक्तेरेखेसाठी नकार दिला. त्यानंतर त्यांनी हा चित्रपट तयार करण्याचा विचारच बाजूला सारला. पण यामुळे सलमान दुखावला गेला होता. दरम्यान संजय लीला भन्साळी यांनी सलमान आणि त्यांच्यात काही वाद झाले होते हे कधीच मान्य केलं नाही. पण त्यानंतर अनेक वर्ष सलमान आणि भन्साळी यांनी एकत्र काम केलं नाही. अनेक वर्षांनंतर सलमान आणि भन्साळी यांनी पुन्हा एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला होता. संजय लीला भन्साळी यांनी त्याच्या आगामी चित्रपट 'इंशाअल्लाह'ची घोषणा केली होती. ज्यात आलिया भट्ट आणि प्रमुख भूमिकेत होते. पण नंतर स्वतः सलमाननंच या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. त्यामुळे आता सलमान आणि भन्साळी एकत्र कधी काम करणार हे येत्या काळात समजू शकेल. दरम्यान अनेक वर्षांनंतर संजय लीला भन्साळी यांनी बाजीराव मस्तानीसाठी रणवीर-दीपिका या जोडीची निवड केली. या आधी या दोघांसोबत भन्साळी यांनी 'गोलियों की रासलीला रामलीला' या चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर या जोडीनं भन्साळींसोबत 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' हे चित्रपट केले आणि ते हिटही झाले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bBhygT