Full Width(True/False)

सलमान खानसोबत 'तो' सीन केल्यावर तासभर रडली होती भाग्यश्री

मुंबई- बॉलिवूडमध्ये असं खूप कमी पाहायला मिळतं की, एखाद्या कलाकाराचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरतो, पण त्यानंतर तो कलाकार मात्र स्वेच्छेने सिनेसृष्टीच सोडतो. 'मैंने प्यार किया' या बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या चित्रपटाची नायिका असलेल्या अभिनेत्री भाग्यश्रीसोबत असंच काहीसं घडलं. अभिनेत्री आणि अभिनेता यांचा सुपरहिट ठरलेला चित्रपट 'मैंने प्यार किया' २९ डिसेंबर १९८९ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटानंतर भाग्यश्री लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. प्रेक्षक तिच्या अभिनयाचे चाहते झाले होते. भाग्यश्रीचं सिनेकरिअर जोर धरणार असं वाटत असताना तिने एक सिनेमा करूनच सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान भाग्यश्री रडू लागली होती. 'मैंने प्यार किया' हा भाग्यश्रीचा पहिलाच चित्रपट होता. सलमानही त्यावेळेस चित्रपटसृष्टीत नवीन होता. त्यामुळे त्याचा म्हणावा तास दबदबा तेव्हा निर्माण झाला नव्हता. १९८९ मध्ये जेव्हा चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झालं तेव्हा 'कबूतर जा जा' या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान सलमानला भाग्यश्रीला मिठीत घ्यायचं होतं. गाण्याचं चित्रीकरण पूर्ण झालं आणि भाग्यश्री अचानक रडू लागली. ते पाहून सलमान खानदेखील प्रचंड घाबरून गेला. त्याला त्याच्याकडून काय चूक झाली, हेचं कळत नव्हतं. यासंदर्भात सलमानने घाबरून दिग्दर्शकांना विचारणा केली असता त्याला भाग्यश्रीच्या रडण्याचं खरं कारण समजलं. दिग्दर्शक त्याला म्हणाले की, भाग्यश्री अशा कुटुंबातून आली आहे जिथे मुलींना फक्त सलवार कमीज किंवा पंजाबी सूट घालण्याची मुभा आहे. त्याशिवाय इतर कोणताही पेहराव करण्याची तिला परवानगी नाही. त्यामुळे जेव्हा सलमानने भाग्यश्रीला मिठीत घेण्याचा सीन चित्रीत केला, तेव्हा ती घाबरून रडू लागली. त्यानंतर दिग्दर्शकांनी तिला असेच सीन चित्रित करण्याची मुभा दिली ज्यात तिला कोणतीही अडचण वाटणार नाही. मैंने प्यार किया सिनेमाच्या चित्रीकरणानंतर भाग्यश्रीने तिचा बॉयफ्रेंड हिमालय दासानीशी लग्न केलं. तिच्या घरातल्यांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे भाग्यश्रीने मंदिरात जाऊन लग्न केलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZIe9ak