Full Width(True/False)

'बिग बॉस १४' जिंकल्यावर रुबीना दिलैक आता करणार दुसरं लग्न

मुंबई- छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय ठरलेला शो 'बिग बॉस १४' चा प्रवास आता संपला आहे. हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री या सीझनची विजेती ठरली. रुबीनाला 'बिग बॉस' च्या ट्रॉफीसोबत ३६ लाख रुपयांचं मानधन देखील मिळालं. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच ती विजेतेपदाची एक मजबूत स्पर्धक मानली जात होती. तिने प्रत्येकवेळी स्वतःला सिद्ध केलं आणि विजेतेपदाची ट्रॉफी मिळवूनच ती घराबाहेर पडली. घरातील इतर स्पर्धक आणि तिचे चाहते तिच्या विजयाने अत्यंत आनंदी आहेत. कार्यक्रमातून बाहेर पडल्यावर रुबीनाने तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत खुलासा केला आहे. खरं तर, रुबीनाने कार्यक्रमात एका टास्कदरम्यान हा खुलासा केला होता की, कार्यक्रमात येण्याअगोदर तिचं वैवाहीक जीवन काही चांगलं चाललं नव्हतं. आणि ती एकमेकांपासून वेगळे होण्याचा विचार करत होते. परंतु, कार्यक्रमातून निघताच तिने लग्नाबद्दल काही गोष्टी सांगितल्या. तिने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिनवबद्दल काही गोष्टी स्पष्ट केल्या. रुबीनाने म्हटलं की, अभिनवमुळे ती 'बिग बॉस' च्या घरात एवढे दिवस राहू शकली. ती त्याच्यामुळेच खंबीरपणे इतर स्पर्धकांचा सामना करू शकली. जेव्हा सलमान खानने विजेती म्हणून तिचा हात वर केला तेव्हा अभिनवने धावत येऊन तिला मिठी मारली होती. तिला शुभेच्छा दिल्या. तो क्षण तिच्यासाठी अत्यंत महत्वाचा होता. अभिनव तिच्यासोबत होता, हे तिच्यासाठी महत्वाचं होतं. त्यानंतर रुबीनाने तिच्या लग्नाबद्दल सांगताना म्हटलं, 'आता मी डेस्टीनेशन वेडींगबद्दल विचार करत आहे. हे माझं दुसरं लग्न असणार आहे, ज्यात आयुष्यभराची साथ असणार आहे. जे वचन आम्ही कार्यक्रमात एकमेकांना दिलं होतं, ते आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे.' रुबीनाने विजेती झाल्यानंतर सर्व कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या. आता रुबीनाच्या अभिनवसोबतच्या दुसऱ्या लग्नाबाबत ऐकून तिच्या चाहत्यांना एक सुखद धक्का बसला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kgKWNh