Full Width(True/False)

Watchlist - एकदा तरी पाहावेत असे मराठी सुपरहिट चित्रपट!

मुंबई: लव्हस्टोरी ते सामाजिक विषयांपर्यंत वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट आणि वेब सीरिज अमेझॉन प्राइम व्हिडीओकडून प्रत्येक आठवड्याला प्रसारित केल्या जातात. आता अमेझॉन प्राइम व्हिडिओच्‍या मोबाइल एडिशनसह तुम्‍हाला स्ट्रिमिंगसाठी उपलब्‍ध असलेले रोमांचक चित्रपट आणि वेबसीरिज निवडण्‍याची संधी मिळत आहे आणि ही सुविधा अगदी मोफत आहे. कुठून सुरूवात करावी याबाबत गोंधळलेले असाल तर आजच वॉचलिस्‍ट तयार करता येईल अशा मराठी सुपरहिट चित्रपटांची यादी.. दुनियादारी (Duniyadari) – ७०च्‍या दशकातील लव्हस्टोरी आणि मैत्रीची कथा मांडणाऱ्या या चित्रपटाचं दिग्‍दर्शन संजय जाधव यांनी केले आहे. हा चित्रपट लेखक सुहास शिरवळकर यांच्‍या दुनियादारी याच नावाच्‍या कादंबरीवर आधारित आहे. हा मागच्या दशकातील एकमेव माराठी चित्रपट आहे, ज्‍याने चित्रपटगृहात ४० आठवडे पूर्ण केले होते. चित्रपटाची कथा पुण्यातील कॉलेज स्टुडंट मित्रांच्‍या अवतीभोवती फिरते, जे प्रेमात पडलेल्या त्‍यांच्‍या मित्रांला लग्न करण्‍यामध्‍ये मदत करतात. पण जशी कथा पुढे सरकते, तसं त्‍यांना समजतं की त्‍यांचा मित्र एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे. काही वर्षांनंतर ते पुन्हा एकदा त्या मित्राच्या जन्मदिवशी त्‍यांच्‍या कॉलेजमधील कट्ट्यावर भेटतात आणि त्यांच्या मैत्रीच्या चांगल्‍या आठवणींना उजाळा देतात. ()– अप्रतिम संवादलेखन, अभिनय आणि सामाजिक वास्तवावर आधारित असलेला चित्रपट प्रत्येकानं एकदा पाहिलाच पाहिजे असा आहे. नाना पाटेकर यांचा अभिनय या चित्रपटाचा गाभा आहे. प्रमुख भूमिकेत नाना पाटेकर, मेधा मांजरेकर आणि विक्रम गोखले असे दिग्‍गज कलाकार असलेला हा चित्रपट शेवटपर्यंत तुमची नजर स्क्रिनवर खिळवून ठेवतो. भातुकली (Bhatukali) – चित्रपटाला अत्‍यंत खास बनवणारी बाब म्‍हणजे चित्रपटाचे कथानक. हा साधी पण तितक्याच ताकदीची कथा असलेला चित्रपट आहे. प्रेमभंग आणि आंबट-गोड नात्‍यांची हृदयस्‍पर्शी कथा असलेला 'भातुकली' हा श्रीकांत देशमुख व त्‍याच्‍या कुटुंबातील सदस्‍यांवर आधारित चित्रपट आहे. () – एक अप्रतिम कलाकृती आणि तुम्‍हाला निश्चितच थक्‍क करेल असा हा चित्रपट आहे. भुकलेल्‍या तान्‍ह्या मुलापर्यंत पोहोचण्‍याचा धाडसी प्रयत्‍न करणा-या आईची वास्‍तविक कथा असलेला चित्रपट आहे. या चित्रपटात प्रत्‍येक सूक्ष्‍म भावनांना सुरेखरित्‍या सादर करण्यात आलं आहे. गवळण हिराची ही कथा आहे, जी रायगडाच्‍या पायथ्‍याशी राहते आणि दूध विकण्‍यासाठी दररोज गडावर जाते. शिवाजी महाराजांनी दिलेल्‍या आदेशानुसार सायंकाळनंतर गडाचे दरवाजे बंद झाल्‍यावर सकाळ झाल्याशिवाय उघडू शकत नाहीत. एके दिवशी हिराला उशीर होतो आणि तोपर्यंत गडाचे दरवाजे बंद झालेले असतात. ती तिच्‍या तान्‍ह्या मुलापर्यंत पोहोचण्‍यासाठी काळोख्‍या रात्रीमध्‍ये उंच कड्यावरून खाली उतरण्‍याचे धाडस करते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37SzMta