Full Width(True/False)

हटके अंदाजात ऋषी कपूर यांनी केलं होतं प्रपोज; नीतू यांनी सांगितल्या खास आठवणी

मुंबई- बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते आजही प्रेक्षकांचे लाडके आहेत. ते भलेही आज आपल्यात नसतील परंतु, त्यांच्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांमध्ये खास स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या जाण्याची रुखरुख त्यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या प्रेक्षकांमध्येही पाहायला मिळते. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम '' मध्ये हजेरी लावली. तेव्हा स्पर्धकांनी ऋषी यांची अनेक गाजलेली गाणी अत्यंत सुरेख पद्धतीने सादर केली. या दरम्यान नीतू यांनी त्यांच्या प्रेमकहाणीचा एक किस्सा प्रेक्षकांसमोर उलगडला. नीतू यांनी ऋषी आणि त्यांच्या नात्याबद्दल सांगताना म्हटलं की, त्या वेळेस ते दोघे खूप चांगले मित्र होते आणि इतर मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी नीतूदेखील त्यांची मदत करत असत. ते देखील तोपर्यंत जोपर्यंत त्या मुली ऋषी यांच्यासोबत डेटवर येण्यासाठी तयार होत नसत. ऋषी यांना नीतू खूप सुंदर आणि क्यूट वाटायच्या. ते दोघे एकमेकांना बॉम्ब म्हणून हाक मारायचे. दोघांनी एकमेकांची खास टोपणनावं देखील ठेवली होती. ते दिवस अत्यंत सुंदर होते, असं नीतू म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी ऋषी यांनी त्यांना टेलिग्राम पाठवून केलेल्या प्रपोजबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या, 'ऋषी कपूर त्यावेळेस पॅरिसला होते आणि मी काश्मीरला माझ्या चित्रपटाचं चित्रीकरण करत होती. अचानक मला ऋषी यांचा टेलिग्राम मिळाला. त्यात लिहिलं होतं की, त्यांना माझी खूप आठवण येत आहे आणि ते माझ्यावर प्रेम करतात.' त्यानंतर नीतू म्हणाल्या, त्यांना आज एका स्पर्धकाच्या गायनात ऋषी यांची झलक दिसली, कारण ते देखील असेच मन लावून अभिनय करायचे. इतकंच नाही तर त्याच्या दिसण्यात देखील ऋषी यांची छबी आहे.ऋषी कपूर यांचं ३० एप्रिल २०२० साली कर्करोगाने निधन झालं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cpMbYk