Full Width(True/False)

आशा नेगीने केलं एक्स बॉयफ्रेण्डचं कौतुक, पुन्हा एकत्र येणार?

मुंबई- छोट्या पडद्यावरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेली अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आशा मालिकांमधील अत्यंत गाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 'पवित्र रिश्ता' मालिकेत ती अभिनेता सोबत दिसली होती. प्रेक्षकांना मालिकेतील ही जोडी प्रचंड आवडली. खऱ्या आयुष्यातही आशा आणि रित्विक अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. आशा आणि रित्विक यांची जोडी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय चाहत्यांसाठी खूप मोठा धक्का होता. त्यांनी ब्रेकअप मागील कारण कधीही स्पष्टपणे सांगितलं नाही. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आशाने रित्विकचं कौतुक केलं आहे. त्यामुळे ते दोघे पुन्हा एकत्र येणार की काय या चर्चांना उधाण आलं आहे. आशाने एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एक्स बॉयफ्रेण्ड रित्विकचं कौतुक केलं. तिने वाईट दिवसांमध्ये साथ दिल्याबद्दल रित्विकचे आभार मानले. तिने जुन्या आठवणींना उजाळा देत म्हटलं की, एक वेळ अशी होती जेव्हा प्रेक्षक तिला फारसे पसंत करत नव्हते. तिचे कार्यक्रमही चालत नव्हते. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. त्या दिवसांमध्ये रित्विकने तिला खूप मदत केली. आशाने म्हटलं, 'जेव्हा तुमची एखादी मालिका चालत नाही तेव्हा तुम्हाला जास्त विचार करायची गरज नसते. पण जेव्हा तुमची दुसरी मालिकाही चालत नाही तेव्हा मात्र तुम्हाला काहीतरी हालचाल करण्याची गरज असते. माझ्या दोन मालिका न चालल्याने मी डिप्रेशनमध्ये गेली होती. मला वाटलेलं की सगळं काही संपलं. तेव्हा मी खूप उदास राहू लागले होते. डिप्रेशनमुळे जास्त खायला सुरुवात केली त्यामुळे माझं वजन वाढलं. त्याचा परिणाम माझ्या मानसिक स्वास्थ्यावर झालेला. माझा आत्मविश्वास पूर्णपणे संपला होता.' तिला वाईट दिवसांमध्ये साथ देण्याचं श्रेय रित्विकला देत ती म्हणाली, 'तेव्हा माझं नशीब चांगलं होतं की मी रित्विकसारख्या चांगल्या माणसाच्या सानिध्यात होते. त्याने मला कधीही एकटीला सोडलं नाही. त्याने मला त्या परिस्थितीतून बाहेर येण्यास मदत केली. माझ्या आयुष्यातील चढ- उतारामध्ये तो माझ्यासोबत होता.' आशाने रित्विकचं केलेलं कौतुक ऐकून त्याच्या चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा ते दोघं एकत्र येणार की काय असा प्रश्न पडला आहे. त्यांनी एकमेकांबद्दल विचार करावा अशी चाहत्यांची इच्छा आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3c1fDDJ