Full Width(True/False)

... तेव्हा तनुश्री दत्तानं राज ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांच्यावरही केले होते गंभीर आरोप

मुंबई: अभिनेते यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केल्यामुळे गेल्या एक दोन वर्षाच अभिनेत्री चर्चेत आहे. तनुश्री पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सक्रिय होणार आहे. नुकतंच तिनं वजनही कमी केलं आहे. तिच्या नवीन लुकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तनुश्री सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर ती व्यक्त होत असते. तनुश्री हिने ज्येष्ठ नाना पाटेकर नव्हे तर अभिनेते आणि मनसे अध्यक्ष यांनाही लक्ष्य केले होतं. 'राज ठाकरेंना बाळासाहेबांची खुर्ची हवी होती. ती मिळाली नाही, म्हणून त्यांनी गुंडांना एकत्र आणून स्वत:चा पक्ष स्थापन केला', असा घणाघात तनुश्रीने केला होता. तसंच 'अमिताभ यांच्यासारखे लोक सामाजिक मुद्द्यांवर सिनेमे करतात. पण प्रत्यक्षात भूमिका घ्यायची वेळ आली की मौन बाळगतात,' अशा शब्दांत तिनं नाराजी व्यक्त केली होती. तनुश्री व नाना वादावर अनेक कलाकारांनी स्वत:ची मते मांडली आहेत. मात्र, अमिताभ व आमीर खान यांच्यासारख्या काही बड्या अभिनेत्यांनी त्यावर कोणतेही भाष्य करणे टाळले आहे. त्यांच्या या भूमिकेविषयी तनुश्रीने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. विशेषत: अमिताभ यांच्या अलिप्ततेबद्दल तिनं आश्चर्य व्यक्त केले होतं. 'हे लोक सामाजिक आशय, विषय असलेले सिनेमे करतात. मात्र, प्रत्यक्ष जीवनात अशा मुद्द्यांवर भूमिका घेण्याची वेळ आली की काहीच बोलत नाहीत,' असे ती म्हणाली होती तसंच 'नाना पाटेकर हा चिंधी अभिनेता आहे. त्याने आणि राज ठाकरेंनी मिळून मला छळले', असे गंभीर आरोप तनुश्री दत्ताने केले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ePTeLo