Full Width(True/False)

अजय देवगणसोबतच्या अफेअरवर करिष्माचा मोठा खुलासा; म्हणाली...

मुंबई ः आणि यांचा 'जिगर' हा सिनेमा १९९२ मध्ये प्रदर्शित झाला. हा सिनेमा सुपरहिट झाला, त्यानंतर या दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले. या दोघांची पडद्यावरची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. त्यामुळे ते दोघे लग्न करतील अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांना होती. दरम्यान, एकामागोमाग एक सिनेमा या दोघांनी केले. काही हिट झाले तर काही फ्लॉप. परंतु या दोघांची केमिस्ट्री चांगलीच जुळली असल्याचीही चर्चा होती.त्यामुळेच हे दोघेजण एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. करिष्मा आणि अजय एकमेकांना डेट करत असतानाच अजय रवीना टंडनलाही डेट करत असल्याचे काहींचे म्हणणे होते. परंतु अजयच्या आयुष्यात करिष्मा आल्यानंतर त्याने रविनाची साथ सोडून दिली. या तिघांचा प्रेमाचा त्रिकोण त्या काळात खूपच चर्चेत होता. अजय आणि करिष्मा यांचे प्रेमप्रकरण तीन वर्ष सुरू होते. हे दोघेजण आता लवकरच लग्न करणार अशाही बातम्या येत होत्या. परंतु १९९५ मध्ये या दोघांचे ब्रेकअप झाले. पडद्यावर आणि ख-या आयुष्यातही जुळले सूर बॉलिवूडमध्ये ९० च्या दशकामध्ये अजय देवगण आणि करिष्मा कपूर यांची जोडी हिट होती. या जोडीने मिळून 'हलचल', 'गुंडाराज', 'संग्राम', 'जिगर' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केले होते. या सिनेमांमध्ये त्यांचे सूर छान जुळले होते. तसेच सूर व्यक्तिगत आयुष्यातही त्यांचे जुळले गेले. ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याची जोरदार चर्चा होती. इतकेच नाही तर हे दोघे लवकरच लग्नही करणार आहेत, येथपर्यंत बातम्या येऊ लागल्या होत्या. त्यामुळे या दोघांच्या चाहत्यांना आता ते लग्न कधी करणार याचीच उत्सुकता होती. करिष्माने केला असा खुलासा परंतु या दोघांमध्ये नेमके काय बिनसले हे समजले नाही मात्र त्यांचे ब्रेकअप झाले. याबाबत काही वर्षांनी करिष्माला एका मुलाखतीमध्ये या नात्याबद्दल विचारले असता ती म्हणाली की, अजय आणि तिच्यात तसे कोणत्याही प्रकारचे नाते नव्हते त्यामुळे त्यांचे लग्न होण्याचा प्रश्नच नाही. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत असे ही तिने सांगितले. तिने पुढे सांगितले की, अजयच्या मनात असे काही सुरू असेल, याबद्दल तिला माहिती नाही. कारण तिने असा कधीच विचार केला नव्हता. कोणताही तर्क कसा लावता? करिष्मा पुढे म्हणाली की, आम्ही दोघांनी मिळून काही सिनेमांत एकत्र काम केले यावरून केवळ आमच्यात काही सुरू आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत, असा तर्क कसा लावला जाऊ शकतो, असा प्रश्नही तिने विचारत असे काहीच नसल्याचे स्पष्ट केले. अजय देवगण आणि काजोल मात्र, रविना टंडन, करिष्मा कपूर आणि अजय देवगण यांच्यात असलेल्या नातेसंबंधांची, त्यांच्यातील कथित प्रेमप्रकरणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा त्याकाळात होती. मात्र, कालांतराने हे सगळे जण आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेले. आणि अजय देवगणच्या आयुष्यात काजोलची एंट्री झाली ती कायमचीच.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fdF9Yj