Full Width(True/False)

'मी कोणत्या परिस्थितीतून गेले...' रुबीना दिलैकने सोडलं मौन

मुंबई- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री नुकतीच 'बिग बॉस' च्या घरातून बाहेर पडली आहे. 'बिग बॉस १४' जिंकल्यावर तिच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ झाली. तिने जिंकण्याच्या आनंदात मित्र- मैत्रिणींना पार्टीदेखील दिली होती. तेव्हापासून प्रसारमाध्यमांचे कॅमेरे सतत तिच्यावर रोखलेले असतात. ती नेहमी चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरंदेखील देत असते. परंतु, काही दिवसांपूर्वीच्या तिच्या विक्षिप्त वागण्यामुळे रुबिनावर गर्विष्ठ असण्याचा ठप्पा लागला होता. अनेकांनी सोशल मीडियावर तिला ट्रोलदेखील केलं. शेवटी रुबीनाने या आरोपांना उत्तर दिलं आहे. काही दिवसांपूर्वी रुबीना पती अभिनव शुक्लासोबत एअरपोर्टवर दिसली होती. तेव्हा अनेकांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. परंतु, एकाही प्रश्नाचं उत्तर न देता रुबीना तिथून निघून गेली. तिचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. तिच्या अशा वागण्याने तिने चाहत्यांना दुखावलं. अनेकांनी तिला गर्व झाल्याचं म्हटलं तर काहींनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं. या सर्व प्रकरणावर रुबीनाने आता प्रतिक्रिया दिली आहे. तिने एका चाहतीसोबत केलेलं चॅट सोशल मीडियावर वायरल झालं आहे. त्यात तिने तिच्या वागण्याचं कारण सांगितलं आहे. रुबीनाने लिहिलं, 'सगळ्यांना माहीत आहे कि मी त्यावेळेस चंदीगढला चित्रीकरण करत होते. माझे कुटुंबीयदेखील तिथे राहतात. माझी आत्या आणि काका चंदीगढमध्ये आहेत. मी जेव्हा 'बिग बॉस' च्या घरात होते तेव्हा माझ्या एका आत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं पण मला त्याबद्दल काहीही सांगण्यात आलं नाही. जेव्हा मी शो जिंकले तेव्हा खूप आनंदात होते.' 'कोणालाही माझ्या आनंदावर विरजण घालायचं नव्हतं त्यामुळे मला तेव्हाही कोणीही काही सांगितलं नाही. माझ्या आजीच्या मते ती वेळ मला ही गोष्ट सांगण्यासाठी योग्य नव्हती. त्यानंतर मला ही वार्ता कळली आणि एअरपोर्टवर मी माध्यमांशी बोलण्याच्या परिस्थितीत नव्हते. मी दुःखी होते.' असं म्हणत तिने तिच्या वागण्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3l4jD9g