Full Width(True/False)

सुरू झाला खेळ, करण जोहरने इन्स्टावर कार्तिक आर्यनला केलं अनफॉलो

मुंबई : करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शच्या आगामी '' या सिनेमातून कार्तिक आर्यनला काढून टाकले असून यातील कलाकारांची निवड पुन्हा नव्याने केली जाणार आहे. इतकेच नाही तर आता भविष्यात कार्तिक आर्यनसोबत काम करणार नसल्याचे जाहीर केले आहे. या सगळ्या घडामोडींनंतर याने कार्तिक आर्यनला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. यासगळ्यावरून करण कार्तिकवर चांगलाच नाराज झाला असल्याची चर्चा बॉलिवडूमध्ये रंगू लागली आहे. ने 'दोस्ताना २' सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये बदल करण्याची मागणी केल्याने करण त्याच्यावर नाराज झाला होता. विकी कौशल की राजकुमार राव? दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दोस्ताना २' मध्ये कार्तिक आर्यनची भूमिका राजकुमार राव अथवा विकी कौशलला दिली जाण्याची शक्यता आहे. या आधी 'दोस्ताना २' सिनेमात कार्तिक आर्यनसोबत जान्हवी कपूर आणि लक्ष्य लालवानी हे प्रमुख भूमिकेत दिसणार होते. आता कार्तिकच्या जागी कोणत्या अभिनेत्याची वर्णी लागते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कॅलिन डिकून्हा करत आहेत. काय झाले होते... दीड वर्षांपूर्वी कार्तिकने ‘दोस्ताना २ ’सिनेमाची स्क्रिप्ट वाचून काम करण्यासाठी होकार दिला होता. त्यानंतर लॉकडाउन लागल्याने सिनेमाच्या कामाला खिळ बसली. काही दिवसानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यावर कार्तिकला या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी तारखा देण्यासाठी विचारणा झाली. तेव्हा कार्तिककडून त्याबाबत टाळाटाळ होऊ लागली. अनेकदा त्याच्याशी संपर्क साधून त्याच्याकडून तारखा घेतल्या. त्यानंतर २० दिवस या सिनेमाचे चित्रीकरणही झाले. परंतु तेव्हा देखील कार्तिकने काही ना काही कारण काढून काम करण्यासाठी पुन्हा टाळाटाळ सुरू केली. अखेर कार्तिककडून कोणतेच सहकार्य मिळत नसल्याने आणि एकूण हे प्रकरण डोईजड होत असल्याने धर्मा प्रॉडक्शनने 'दोस्ताना २' मधून कार्तिकला काढून टाकण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच भविष्यात यापुढे धर्मा प्रॉडक्शन त्याच्यासोबत काम करणार नाही असेही स्पष्ट केले. कार्तिकचे वागणे अव्यावसायिक करण जोहर आणि त्याच्या धर्मा प्रॉडक्शनवर कायमच घराणेशाहीचे आरोप केले जातात. या पार्श्वभूमीवर 'दोस्ताना २' या सिनेमातून एक नवोदित अभिनेता सिनेमासृष्टीमध्ये येत आहे. त्याला कोणतीही सिनेमाची पार्श्वभूमी नाही. तसेच कार्तिकलाही कोणतीही सिनेमाची कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती. या सिनेमाच्या निमित्ताने धर्मा प्रॉडक्शनवर होणारे हे आरोप खोडून टाकण्यााची नामी संधी होती. परंतु कार्तिकच्या या अव्यवसायिक वागण्यामुळे त्यांच्यावर नाईलाजाने कठोर कारवाई केल्याची माहिती सुत्रांनी दिली. जान्हवीसोबतही कार्तिकला होता प्रॉब्लेम 'दोस्ताना २' या सिनेमात जान्हवी कपूरही काम करत आहे. तिच्यासोबत कार्तिकचे काही व्यक्तिगत वाद होते. सुरुवातील त्याने हे वाद बाजूला ठेवत २० दिवसांचे चित्रीकरण केले होते. परंतु नंतर त्याने हे व्यक्तिगत वाद कामाच्या ठिकाणी आणले. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत होत्या.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QyZfSF