मुंबई: बॉलिवूड अभिनेता आता या जगात नाही पण त्यांचे किस्सेम मात्र आजही लोकांच्या हृदयात तसेच आहेत. असाच एक रंजक किस्सा अभिनेता यांनं एका मुलाखतीत सांगितला. ऋषी कपूर आपल्या मुलाच्या खासगी आयुष्याबद्दल कसे चिंतेत असायचे आणि ते त्याच्यावर कशाप्रकारे लक्ष ठेवायचे हे अभिषेक बच्चननं सांगितलं. अभिषेकनं एका मुलाखतीत सांगितलं, 'आम्ही त्यावेळी शिमला येथे शूटिंग करत होतो. मी सकाळी कॉफीसाठी ऋषी कपूर यांच्या रुममध्ये गेलो तर ते त्यांच्या कम्प्यूटरवर काहीतरी पाहत होते. मी पाहिलं की ते कोणत्यातरी सेलिब्रिटी गॉसिप वेबसाइटवर बाबतच्या बातम्या वाचत होते.' अभिषेकला माहीत नव्हतं की, ते नेमकं काय करत आहेत. त्यामुळे त्यानं ऋषी कपूर यांना विचारलं त्यावर त्यांनी अभिषेकला गॉसिप वेबसाइट दाखवली आणि म्हणाले की, मी हे जाणून घेत आहे की, रणबीर कपूरच्या आयुष्यात काय चाललं आहे. अभिषेक बच्चन आणि ऋषी कपूर यांनी 'दिल्ली-६ ' आणि फिल्म 'ऑल इज वेल' या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. एप्रिल २०१८ मध्ये ऋषी कपूर यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांनी जवळपास वर्षभर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेऊन २०१९मध्ये भारतात परतले होते. त्यानंतर काही काळानंतर तब्येत अचानक बिघडल्यानंतर २९ एप्रिल २०२० रोजी त्यांना हॉस्पिलटमध्ये भरती करण्यात आलं होतं. पण ३० एप्रिल २०२० रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QlIeeE