Full Width(True/False)

'तुझ्यामुळे त्यानं कॅच सोडला' शर्मिला यांच्यावर भडकलेले वडील

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्धणार विराट कोहली जेव्हा मैदानावर चांगलं प्रदर्शन करत नाही त्यावेळी यासाठी नेहमीच अभिनेत्री अनुष्का शर्माला जबाबदार ठरवलं जातं. अनेकदा तिला ही टीका सहन करावी लागली आहे. हे सर्व एकेकाळी अभिनेत्री यांच्यासोबतही घडलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शर्मिला यांनी अनेक वर्षांनी हे दुःख व्यक्त केलं. जेव्हा त्यांचे पती क्रिकेटर यांचं प्रदर्शन जेव्हा चांगलं होत नसे त्यावेळी त्यासाठी शर्मिला यांना जबाबदार ठरावलं जात असे. एका वेबसाइटनं दिलेल्या वृत्तानुसार शर्मिला यांनी हा किस्सा शेअर करताना सांगितलं, 'एकदा मन्सूर अली खान पतौडी उर्फ टायगर यांच्याकडून एक कॅच सुटला होता. यावरून दुसरं कोणी नाही तर चक्क शर्मिला यांच्या वडिलांनींच त्यांना यासाठी दोषी मानलं होतं. एवढंच नाही तर त्यांचे वडील त्यांच्यावर चिडले आणि म्हणले, तुझ्यामुळे त्यानं कॅच सोडला तू त्याला रात्रभर जाग ठेवायला नको होतं.' शर्मिला टागोर यांच्या अभिनयाचे चाहते जसे त्यावेळी होते तसेच मन्सूर अली खान पतौडी यांच्या खेळाचे चाहते सुद्धा त्यावेळी होते. आज ज्याप्रमाणे अनेकदा अनुष्का शर्माला विराट कोहलीच्या वाईट प्रदर्शनासाठी लोकांचे टोमणे आणि टीका ऐकावी लागते तसं त्यावेळी शर्मिला यांच्यासोबतही घडलं होतं. मन्सूर अली खान पतौडी यांच्या वाईट प्रदर्शनासाठी अनेकदा शर्मिला टागोर यांच्यावर टीका होत असे. शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी यांनी लव्ह मॅरेज केलं होतं. या दोघांना सैफ अली खान, सोहा अली खान आणि सबा अली खान अशी तीन मुलं आहेत. २२ सप्टेंबर २०११ मध्ये वयाच्या ७० व्या वर्षी मन्सूर अली खान पतौडी यांनी दिल्ली येथील सर गंगा राम रुग्णालयात शेवटचा शेवटचा श्वास घेतला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wXqQxn