० ‘त्या’ फोटोचं रहस्य काय?- येत्या १८ तारखेला 'मधानिया' हा आमचा अल्बम येतोय. अल्बममधल्या ‘मधानिया’ गाण्याच्या व्हिडीओमध्ये आमचं लग्न झाल्याचं दाखवलं आहे. तोच फोटो शेअर केला. पण असं वाटतंय की आमची ‘ड्रेस रिहर्सल’ झाली आहे. ० लॉकडाउनमुळे गायक पुन्हा अल्बमकडे वळले आहेत, तुझ्या या अल्बममध्ये काय असेल?- आजकल अल्बम ट्रेंडिंग आहेत. माझी पाच गाणी बॅक टू बॅक येताहेत. त्यापैकी मधानिया हे पहिलं गाणं आहे. हे लग्नाचं गाणं आहे. ही कल्पना देसी म्युझिक फॅक्टरी यांची होती. साधारणपणे 'बिग बॉस' झाल्यानंतर अनेक जण व्हिडीओ शूट करतात. पण माझं तर हेच काम आहे. मी मुळातच गायक असल्यामुळे 'बिग बॉस'मध्ये मी आलो असतो किंवा नसतो, मी अल्बम करणारच होतो. ० ‘बिग बॉस’मुळे तुझं आयुष्य किती बदललं?- ते घर खूप काही शिकवतं. आपल्याच स्वभावाबद्दल आपल्याला ज्या गोष्टी माहिती नसतात, त्या तिथे गेल्यानंतर कळतात. विशेषत: दुसऱ्यांच्या नजरेतून. माझा अनुभव अप्रतिम होता. शो संपल्यानंतर लोकांनी मला खूप जास्त प्रेम दिलंय. त्यांना माझं त्या घरात असणं आवडलं. मी जसा आहे, तसाच तिथेही होतो. मी स्वत:ला बदललं नाही. ० गायक, बिग बॉस, आता पुढे काय?- मी गायक आहे. अल्बम, व्हिडीओ काढणार. चित्रपटांसाठी ऑफर येत आहेत. काय होतं ते पाहूयात. मला मराठी सिनेमासाठी विचारलं तर मी तेही करणार. मराठी सिनेसृष्टीविषयी मला नक्कीच प्रेम वाटतं. त्यामुळे चांगली संधी आली तर ती नक्कीच स्वीकारणार. ० अल्बममधल्या लग्नाप्रमाणे खऱ्या आयुष्यात कधी खुशखबर देणार?- विचार सुरू आहे. लॉकडाउनमुळे काही तयारी करता आलेली नाही. लग्न कधी करायचं, कोणाला बोलवायचं हे काही ठरवता आलेलं नाही. पण सध्याची परिस्थिती सुधारली की आम्ही नक्कीच आनंदाची बातमी देऊ. मराठी लोकांचा पाठिंबा... मला खूप आनंद होतो की, माझ्या मराठी लोकांनी मला खूप पाठिंबा दिला. माझ्यावर भरभरून प्रेम केलं. अनेक चाहत्यांचे मेसेजेस येतात. चाहत्यांचं हे प्रेम पाहून मी भारावून जातो.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3a9Lhxf