Full Width(True/False)

भूतकाळ विसरुन 'या' बॉलिवूड कलाकारांनी लावली एक्सच्या लग्नात हजेरी

मुंबई: बॉलिवूडमध्ये नेहमीच अभिनेता आणि अभिनेत्रींच्या अफेअर्सचे किस्से ऐकायला मिळतात. अनेकदा एखादं स्टार कपल लग्न करेल असं वाटत असतानाच त्यांचं ब्रेकअप झालंचंही ऐकू येतं. पण काही असेही बॉलिवूड कलाकार आहेत ज्यांनी ब्रेकअपनंतर मैत्री कायम ठेवली. जिथे एकीकडे ब्रेकअपनंतर लोक एकमेकांशी बोलणं बंद करतात अशा ठिकाणी बॉलिवूडच्या काही कलाकारांनी मागची सर्व भांडणं विसरून आपल्या एक्स गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या लग्नाला हजेरी लावली होती. बॉलिवूडची देसी गर्ल आणि हॉलिवूड स्टार प्रियांका चोप्रानं २०१९मध्ये अमेरिकन गायक आणि अभिनेता निक जोनसशी लग्न केलं. तिच्या लग्नात काही जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार वगळता कोणालाच एंट्री नव्हती मात्र त्यानंतर मुंबई येथे झालेल्या रिसेप्शनला मात्र सर्वच बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. ज्यात प्रियांकाचे एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूर आणि हरमन बवेजा दोघांचाही समावेश होता. अभिनेत्री बिपाशा बासूनं अभिनेता करण सिंह ग्रोव्हरशी लग्न केलं. त्यावेळी या लग्नाला तिचा एक्स बॉयफ्रेंड डिनो मोरियासुद्धा उपस्थित होता. करण सिंह ग्रोव्हरशी रिलेशनशिप आधी बिपाशा आणि डिनोच्या अफेअरच्याही खूप चर्चा झाल्या होत्या. पण नंतर दोघं वेगळे झाले. डिनोनं आपली मैत्री कायम ठेवत बिपाशाच्या लग्नाला हजेरी लावली होती. अनुष्का शर्मानं २०१८ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीशी लगीनगाठ बांधली. पण एक वेळ अशी होती की, अनुष्काचं नाव अभिनेता रणवीर सिंगशी जोडलं गेलं होतं. या दोघांनी या नात्याची कधीच कबुली दिली नव्हती पण नंतर अनुष्का विराटच्या प्रेमात पडली तर रणवीर दीपिका पदुकोणच्या. पण जेव्हा अनुष्कानं विराटशी लग्न केलं तेव्हा रणवीर तिच्या रिसेप्शनला उपस्थित होता आणि दीपिका-रणवीरच्या लग्नानंतर अनुष्कानंही त्यांच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. जेव्हा नेहा धूपिया आणि अंगद बेदी यांनी लग्न तेव्हा त्यांच्या लग्नाची बातमी अचानक समोर आली होती. त्याआधी नेहाचं नाव क्रिकेटर युवराज सिंग यांच्याशीही जोडलं गेलं होतं. पण जेव्हा नेहा-अंगदनं त्यांच्या लग्नाची पार्टी दिली त्यावेळी युवराजसुद्धा त्या पार्टीमध्ये सहभागी झाला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tuBfyC