Full Width(True/False)

राकेश रोशन यांनी दिलेला सल्ला न ऐकणं ऋषी कपूर यांच्यासाठी ठरली होती मोठी चूक

मुंबई- बॉलिवूड अभिनेते आणि हृतिक रोशनचे वडील यांनी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची मैत्री जवळपास ४५ वर्ष जुनी होती. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. आज ऋषीजींना जाऊन एक वर्ष झालं आहे परंतु, त्यांच्या आठवणी मात्र सगळ्यांच्या मनात कायम आहेत. राकेश यांनी एका मुलाखतीत असा खुलासा केला आहे की, त्यांनी ऋषी यांना त्यांची तब्येत सांभाळण्याचा सल्ला दिला होता. परंतु, त्यांचं न ऐकता ते दिल्लीला गेले आणि त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. राकेश यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, 'मी १५ मार्च २०२० रोजी त्यांना शेवटचं भेटलो. मी त्यांच्या घरी डिनरसाठी गेलो होतो. त्या दिवशी मी त्यांच्याशी तीन तास बोलत होतो. आम्ही एकमेकांच्या तब्येतीची चौकशी केली. मी स्वतः कर्करोगासारख्या मोठया आणि भयंकर आजाराचा सामना केला आहे. त्यावेळेस ऋषीने मला विचारलं की, मी माझ्या पुढच्या चित्रपटाचं चित्रीकरण का सुरू करत नाही. तेव्हा मी त्याला म्हणालो, मी सगळ्यात आधी माझी तब्येत ठीक करु इच्छितो त्यानंतर मी काम करायला सुरुवात करेन आणि मी ऋषीला त्याच्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगितली होती.' ऋषी यांच्या दिल्ली जाण्याबद्दल सांगताना ते म्हणाले, 'आम्हाला दोघांना वेगवेगळ्या प्रकारचा कर्करोग होता. जेव्हा ऋषीने मला सांगितलं की, तो एका लग्नासाठी दिल्लीला जातोय तेव्हा मी त्याला जाण्यापासून अडवलं होतं. तू आता तब्येतीची काळजी घे आणि लग्नाला जाऊ नको असं म्हटलं. पण त्याने माझं ऐकलं नाही. जेव्हा तो दिल्लीला गेला तेव्हा तो आणखी आजारी पडला आणि त्याला इस्पितळात भरती करावं लागलं.' राकेश यांचं म्हणणं न ऐकून ऋषीजींनी मोठी चूक केली होती असं त्यांनी म्हटलं. राकेश स्वतः खूप आजारी असल्याने ऋषीजींच्या अंतिम संस्कारासाठी जाऊ शकले नव्हते याची आजही त्यांना खंत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Sc4CYA