Full Width(True/False)

सिनेसृष्टीला करोनाचा आणखी एक धक्का, अभिनेत्री गीता बहल यांचं निधन

मुंबई: ८० च्या दशकात ऋषी कपूर आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलेल्या अभिनेत्री यांचं शनिवारी निधन झालं. करोना व्हायरसची लागण झाल्यानं त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांचा करोना व्हायरसमुळे निधन झालं. गीता बहल ८०-९०च्या दशकातील अभिनेता रवी बहल यांची बहीण होत्या. गीता बहल यांचा भाऊ रवी बहल, त्यांची ८५ वर्षीय आई आणि घरात काम करणारी बाई यांनाही करोनाची लागण झाली होती. मात्र हे सर्वजण यातून ठीक झाले आहेत. पण गीता यांची प्रकृती अधिकच खालावल्यानं त्यांना २६ एप्रिलला आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. मागच्या दोन दिवसांपासून त्या व्हेंटिलेटरवर होत्या. गीता बहल यांची बालपणचे मित्र, अभिनेता आणि दिग्दर्शन आकाशदीप साबिर यांनी गीता यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना म्हटलं, 'गीता यांची आई, भाऊ आणि घरात काम करणारी बाई हे सर्वच वेळेवर ठीक झाले. पण गीता यांची तब्बेत अधिक खालावल्यानं त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. मागच्या काही दिवसांमध्ये त्यांची ऑक्सिजनची पातळी सातत्यानं अस्थिर होती. ज्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.' गीता बहल यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक राज खोसला यांच्या 'मैं तुलसी तेरे आंगन की' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. आपल्या बॉलिवूड करिअरमध्ये त्यांनी दो प्रेमी (१९८०), जमाने को दिखाना है (१९८१), मैंने जीना सीख लिया (१९८२), मेरा दोस्त मेरा दुश्मन (१९८४), नया सफर (१९८५)यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. याशिवाय त्यांनी गुजराती आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PL7Wcu