Full Width(True/False)

नर्गिस यांच्या लग्नानंतर स्वतःला सिगारेटचे चटके द्यायचे राज कपूर

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दत्त यांनी एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. १ जून १९२९ रोजी जन्मलेल्या नर्गिस यांचं खरं नाव फातिमा राशिद होतं. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांनी बालकार म्हणून चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती. १९५८ मध्ये त्यांनी यांच्याशी लग्न केलं. नर्गिस त्यांच्या नात्याबद्दल नेहमीच प्रामाणिक राहिल्या. सुनिल कपूर यांच्या आधी त्यांच्या आयुष्यात होते. पण त्यांची लव्ह स्टोरी अपूर्ण राहिली. त्यानंतर जेव्हा नर्गिस यांनी सुनील दत्त यांच्याशी लग्न केलं. तेव्हा त्यांच्या लग्नानंतर राज कपूर स्वतःला सिगारेटचे चटके देत असत. अभिनेता राज कपूर आणि नर्गिस यांनी 'आवारा' 'श्री ४२०' आणि 'बरसात' यांसारख्या जवळपास १६ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. त्यांच्या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. राज कपूर तर पाहताक्षणी नर्गिस यांच्या प्रेमात पडले होते आणि नर्गिसही त्यांच्या प्रेमात होत्या. पण या दोघांमध्ये समस्या ही होती की, राज कपूर विवाहित होते आणि त्यांना मुलंही होती. पण असं असतानाही त्यांनी नर्गिस यांना अनेकदा सांगितलं होतं की, ते त्यांच्याशी लग्न करणार आहेत. राज कपूर आणि नर्गिस एकमेकांसोबत जवळपास नऊ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यानंतर नर्गिस यांना जाणीव झाली की, राज कपूर त्यांच्याकडे लक्ष देत नाहियेत आणि ते आपलं लग्नही मोडणार नाहीत किंवा वडिलांच्या विरोधातही जाऊ शकणार नाहीत. त्यावेळी नर्गिस यांनी राज कपूर यांच्यासोबतचे सर्व संबंध तोडून टाकले. जेव्हा राज कपूर यांना सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या लग्नाबद्दल समजलं. तेव्हा ते स्वतःला सिगारेटचे चटके देत असत. हे पाहण्यासाठी की कुठे हे स्वप्न तर नाही ना. नर्गिस यांच्यावर पुस्तक लिहणाऱ्या टीजेएस जॉर्ज यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे की, नर्गिस आणि सुनील दत्त यांच्या लग्नानंतर राज कपूर यांनी मोठ्या प्रमाणावर दारु पिण्यास सुरुवात केली होती. नर्गिस यांना कॅन्सर होता. त्यानंतर त्यांच्या संपूर्ण शरीरात प्रचंड वेदना होत असत. डॉक्टरांनी सल्ला दिला होता की, नर्गिस यांची लाइफ सपोर्ट सिस्टिम काढून टाकावी. पण सुनील दत्त यांनी असं करण्यास नकार दिला. १९८१ मध्ये जेव्हा संजय दत्तचा पहिला चित्रपट 'रॉकी' रिलीज होणार होता. त्यावेळी नर्गिस यांना आपल्या मुलाचा चित्रपट कोणत्याही परिस्थिती पाहायचा होता. त्या यासाठी खूप उत्साहित होत्या. हा चित्रपट ८ मे दिवशी रिलीज होणार होता आणि त्याआधीच ३ मे रोजी नर्गिस यांचं निधन झालं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3c7Ujf8