Full Width(True/False)

‘'सारेगमप लिटिल चॅम्प्स’चे नवं पर्व हा माझ्यासाठीही वेगळा अनुभव'

मुंबई : ‘झी मराठी’वरील '' या कार्यक्रमावर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. हा कार्यक्रम होऊन अनेक वर्ष झाली असली तरी या कार्यक्रमातील ‘पंचरत्न’ म्हणजेच ‘प्रिटी यंग गर्ल’ आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, ‘लिटिल मॉनिटर’ मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, आणि रोहित श्याम राऊत यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. प्रेक्षकांचा हा लाडका कार्यक्रम लवकरच पुन्हा एकदा त्यांच्या भेटीस येणार आहे आणि त्याबद्दल आपल्या भावना व्यक्त प्रेक्षकांचा लाडका मोदक म्हणजेच याने व्यक्त केल्या आहेत. सारेगमप लिटिल चॅम्प्स ' चं नवीन पर्व सुरु होणार आहे. त्याविषयी सांग... लवकरच 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चं नवीन पर्व सुरू होणार आहे. यात माझ्यासोबत आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन आणि रोहित राऊत सहभागी होणार आहेत. यावेळी आम्ही स्पर्धक म्हणून नाही तर ज्युरी म्हणून या कार्यक्रमाचा हिस्सा असणार आहोत. ऑडिशनची प्राथमिक फेरी पार पडली आहे. आम्ही सर्वजण प्रदीर्घ कालखंडानंतर पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत, त्यामुळे आम्ही सर्वजण खूप उत्साहित आहोत. १२ वर्षांनंतर तुम्ही पाच जण एकत्र येणार आहात. कसं वाटतंय ? गेली बारा वर्ष आम्ही पाचजण एकमेकांच्या संपर्कात होतो. आता या कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा आमची धमाल मजा मस्ती सुरू झाली आहे. प्रथमच ज्युरीची भूमिका निभावत असल्यामुळे त्यासाठी आमची वेगळी तयारी चालू आहे. आम्ही खूप ज्युनिअर असलो तरी मागील १२ वर्षांचा अनुभव चांगला आहे. ऑडिशनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचा कसा अनुभव आला ? ऑडिशनमध्ये सहभागी झालेल्या सर्व मुलांची गाणी आम्ही ऐकली. वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकायला मिळाली. कोणाचा गळा चांगला आहे. कोणाची तान छान, कोणावर मेहनत घेता येऊ शकते, या गोष्टी समजत असल्यामुळे हा आमच्यासाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे. आताची मुलं हुशार तर आहेतच पण स्मार्ट देखील आहेत. त्यामुळे या पर्वात मजा येणार आहे. ‘सारेगमप’ या कार्यक्रमाने तुम्हा पाचही जणांना संगीत क्षेत्रात मोठी संधी मिळाली आहे. त्याच मंचावर पुन्हा एकदा परत येताना कसे वाटते आहे? एखादी व्यक्ती शिक्षण घेण्यासाठी कुटुंबापासून दूर परदेशी जाते आणि मग शिक्षक घेऊन परतते तशी भावना मनात आहे. सारेगमप हा कार्यक्रम नसून ती आमचे कुटुंब आहे. मधल्या १२ वर्षांच्या काळात आमचं खऱ्या अर्थाने शिक्षण सुरू होते आणि अजूनही सुरुच आहे. आता पुन्हा एकदा या कुटुंबाशी जोडले जाणार असल्याचा प्रचंड आनंद होतोय. सारेगमपच्या मंचांमुळे तुझ्यात काय बदल झाला? सारेगमपचा प्लॅटफॉर्म फक्त तेवढ्या पुरता मर्यादित नव्हता किंवा केवळ प्रसिद्धी मिळ्वण्यापुरता देखील नव्हता. या कार्यक्रमामुळे आमच्यामधील विविध गुण अधिक विकसीत झाले. मुख्यत्वे सांगीतिक बाजू. दिग्गजांचा सहवास लाभला. मोठमोठ्या इव्हेंट्सला गेल्यावर वेळेचे पालन करायला शिकलो. अंगी वक्तशीरपणा आला. म्युझिकली बऱ्याच गोष्टी कळल्या. सुरुवातीला मी अभंग, भावगीत आणि नाट्यसंगीत गायचो पण इथे आल्यावर वेगवेगळे फॉर्म्स गेला मिळाले. लोकसंगीताचा बाज ट्राय केला. वेस्टर्न गाणी गायली. लतादीदी मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, किशोरी आमोणकर यांसारख्या दिग्गजांचे आशीर्वाद लाभले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3pSdaAG