Full Width(True/False)

सलमान- केआरके प्रकरणात नाव आल्याचं पाहून भडकला गोविंदा

मुंबई- बॉलिवूड अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान म्हणजेच यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. केआरकेने सलमानवर लावलेल्या गंभीर आरोपांच्या विरोधात सुपरस्टारने तक्रार दाखल केली. न्यायालयात यावर सुनावणी सुरू आहे. परंतु, आता या वादात अभिनेता यालादेखील ओढण्यात आलं आहे. केआरकेने एक ट्वीट करत गोविंदाचे आभार मानले होते. त्यावरून या वादात गोविंदा केआरकेला पाठिंबा देत असल्याचं चित्र निर्माण झालं. परंतु, गोविंदाने या गोष्टीला नकार देत त्याची भूमिका स्पष्ट केली. माझ्या चित्रपटांबद्दलही केआरकेने चुकीची विधानं केली केआरकेने ट्वीटमध्ये गोविंदाचे आभार मानत त्याला निराश करणार नसल्याचं लिहिलं होतं. त्यामुळे गोविंदा केआरकेला पाठिंबा देत असल्याचा चाहत्यांचा समज झाला. परंतु, गोविंदाला ही गोष्ट कळताच त्याने या चर्चांचं खंडन करत म्हटलं, 'मी काही बातम्यांमध्ये वाचलं आहे की मी केआरकेला पाठिंबा देतोय. मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेली कित्येक वर्ष मी केआरकेच्या संपर्कात नाही. कोणतीही मिटिंग नाही किंवा कोणताही फोन नाही. मला वाटतं त्याने दुसऱ्या कोणत्यातरी व्यक्तीला उद्देशून ते ट्वीट केलं आहे. स्वतःला खूप मोठा समीक्षक म्हणवणारा केआरके माझ्या चित्रपटांबद्दल आणि माझ्याबद्दलदेखील अनेकदा चुकीचं बोलला आहे.' माहीत नाही वाद काय आहे सलमान आणि केआरके यांच्यात सुरू असलेल्या वादाबद्दल काहीही माहीत नसल्याचं सांगत गोविंदा म्हणाला, 'मला तर हे देखील माहीत नाही की सलमान आणि केआरकेमध्ये कोणत्या कारणामुळे वाद सुरू आहे पण माझं नाव उगीचमध्ये आणलं जातंय. असाच एक प्रयत्न चित्रपट समीक्षक कोमल नाहटानेदेखील केला होता. त्यावेळेस कार्तिक आर्यनला काही चित्रपटातून बाहेर केलं गेलं होतं आणि त्यात माझं नावमध्ये घेतलं गेलं होतं. मला वाटतं करोना महामारीमध्ये हा एक प्रकारचा अजेंडा झाला आहे. पण या दोन्ही प्रकरणाशी माझा तिळमात्रही संबंध नाही.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3podlDK