Full Width(True/False)

भारतीय सैन्य दलाबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? सिध्दार्थ मल्होत्रा म्हणतो...

संपदा जोशी ० '' या सिनेमातल्या भूमिकेनं तुला काय शिकवलं?- आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात 'भीती' ही सगळ्यात मोठी समस्या असते. भीतीमुळे अनेक गोष्टी करायच्या राहून जातात. कोणत्याही गोष्टीला घाबरण्याची गरज नाही हेच मी कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या व्यक्तिमत्त्वाकडून शिकलो. त्यांचा आत्मविश्वास, लढावू वृत्ती हे सगळंच प्रेरणादायी आहे आणि त्यांचं 'ये दिल मांगे मोर' हे वाक्य तर फारच भावलं. देशातील तरुणांनाही यातून प्रेरणा मिळेल, अशी आशा व्यक्त करतो. ० भूमिकेचा अभ्यास कसा केलास? - खऱ्या आयुष्यातल्या नायकाला साकारण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. जवानाची भूमिका असल्यानं माझ्यावर मोठी जबाबदारी होती. कॅप्टन विक्रम यांचा परिवार, भारतीय सैन्य दल यांचा विचार करत मी मेहनत केली. त्यांचा विचारप्रवाह, वैयक्तिक आयुष्यातला दिलदार पंजाबी मुलगा आणि सीमेवरचा बिनधास्त, देशासाठी वेडा असलेला सैनिक या सगळ्या पैलूंना समजून घेऊन ही भूमिका करण्याचा मी प्रयत्न केला. एका सैनिकाची भूमिका असल्यानं सैन्य प्रशिक्षण, शस्त्रं कशी वापरायची, सैन्याचे नियम या सगळ्याचा अभ्यास केला. ० चित्रपटाच्या संपूर्ण प्रक्रियेत तंदुरुस्त राहण्यासाठी काय केलंस?- चित्रपटासाठी फिटनेस महत्त्वाचा होता. समुद्रसपाटीपासून १२ ते १४ हजार उंच अशा भागात युद्धं झालं होतं. तिथे ऑक्सिजनची कमतरता भासते. त्यामुळे तिथे पोहोचण्यासाठी, लढण्यासाठी मी विशिष्ट प्रशिक्षण घेतलं. फिटनेसच्या बाबतीत मी नेहमीच सतर्क असतो; पण 'शेहशाह' चित्रपटातील भूमिकेसाठी मी अधिक प्रयत्न केले. ० भारतीय सैन्य दलाबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?- अविस्मरणीय अनुभव! सीमेवर लढाई झाली, ताणतणावाचं वातावरण हे आपल्यासाठी घरात बसून बातम्यांमधून वाचणं, बघणं खूप सोपं आहे; पण प्रत्यक्षात सीमेवर आपले जवान हे सगळं अनुभवत असतात. त्यांच्याबरोबर काम करताना ते त्यांचा जीव पणाला लावून लढत असतात याची जाणीव झाली. त्यांच्याविषयी आदर वाढला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सैनिकांचं आयुष्य मी जवळून बघितलं आहे आणि त्यातून मी खूप काही शिकलोही आहे. ० चित्रीकरणा दरम्यानचा एखादा लक्षात राहिलेला प्रसंग...- कारगिलमध्ये खऱ्या जवानांबरोबर युद्धाच्या सीनची तयारी करत होतो. मी त्यांच्याबरोबर जमिनीवर बसलो होतो. या सीनचं चित्रीकरण होणार असं आम्हाला सांगण्यात आलं तेव्हा मी माझ्या कपड्यांवरची माती झटकत होतो. तेव्हा इतर जवान मला म्हणाले, 'सर, माती का झटकताय? माती तर आपलीच आहे ना.' तेव्हा मी भावुक झालो होतो. त्या सीनसाठी माती झटकणं गरजेचं आहे; पण माझं या मातीवर खूप प्रेम आहे; असं मी त्यांना समजावलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Wi4UQi