Full Width(True/False)

vodafone-idea बंद होणार? भारतीय ग्राहकांना बसेल मोठा फटका, ‘ही’ आहेत ५ कारणे

टेलिकॉम कंपन्या वोडाफोन-आयडिया, एअरटेल आणि रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. मात्र, गेल्या काही वर्षात जिओच्या आगमनानंतर इतर टेलिकॉम कंपन्यांना मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. एकेकाळी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेली वोडाफोन-आयडिया आज देशात तिसऱ्या स्थानावर आहे. कंपनीच्या ग्राहकांची संख्या २७० मिलियन एवढी आहे. मात्र, गेल्या काही महिन्यात कंपनीला अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. Telecom Regulatory Authority of India (TRAI) च्या आकडेवारीनुसार, जून २०२१ मध्ये वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांची संख्या ४२,८९,५१९ ने कमी झाली आहे. ग्राहकांची संख्या कमी झाल्याने कंपनीला मोठा आर्थिक तोटा पाहायला मिळत आहे. कंपनी दिवाळखोरीत जाण्याची शक्यता असल्याने ग्राहकांना देखील याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे रिचार्ज प्लान्स देखील महागण्याची शक्यता आहे. मात्र, वोडाफोन-आयडियाच्या अपयशामुळे भारतातील ग्राहकांना देखील मोठा फटका बसणार आहे.

टेलिकॉम कंपन्या वोडाफोन-आयडिया, एअरटेल आणि रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. मात्र, गेल्या काही वर्षात जिओच्या आगमनानंतर इतर टेलिकॉम कंपन्यांना मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. एकेकाळी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेली वोडाफोन-आयडिया आज देशात तिसऱ्या स्थानावर आहे. कंपनीच्या ग्राहकांची संख्या २७० मिलियन एवढी आहे. मात्र, गेल्या काही महिन्यात कंपनीला अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. Telecom Regulatory Authority of India (TRAI) च्या आकडेवारीनुसार, जून २०२१ मध्ये वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांची संख्या ४२,८९,५१९ ने कमी झाली आहे. ग्राहकांची संख्या कमी झाल्याने कंपनीला मोठा आर्थिक तोटा पाहायला मिळत आहे. कंपनी दिवाळखोरीत जाण्याची शक्यता असल्याने ग्राहकांना देखील याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे रिचार्ज प्लान्स देखील महागण्याची शक्यता आहे. मात्र, वोडाफोन-आयडियाच्या अपयशामुळे भारतातील ग्राहकांना देखील मोठा फटका बसणार आहे.


vodafone-idea बंद होणार? भारतीय ग्राहकांना बसेल मोठा फटका, ‘ही’ आहेत ५ कारणे

टेलिकॉम कंपन्या वोडाफोन-आयडिया, एअरटेल आणि रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. मात्र, गेल्या काही वर्षात जिओच्या आगमनानंतर इतर टेलिकॉम कंपन्यांना मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. एकेकाळी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेली वोडाफोन-आयडिया आज देशात तिसऱ्या स्थानावर आहे. कंपनीच्या ग्राहकांची संख्या २७० मिलियन एवढी आहे. मात्र, गेल्या काही महिन्यात कंपनीला अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. Telecom Regulatory Authority of India (TRAI) च्या आकडेवारीनुसार, जून २०२१ मध्ये वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांची संख्या ४२,८९,५१९ ने कमी झाली आहे. ग्राहकांची संख्या कमी झाल्याने कंपनीला मोठा आर्थिक तोटा पाहायला मिळत आहे. कंपनी दिवाळखोरीत जाण्याची शक्यता असल्याने ग्राहकांना देखील याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे रिचार्ज प्लान्स देखील महागण्याची शक्यता आहे. मात्र, वोडाफोन-आयडियाच्या अपयशामुळे भारतातील ग्राहकांना देखील मोठा फटका बसणार आहे.



​जिओ, एअरटेलच्या नेटवर्कवर पडेल दबाव
​जिओ, एअरटेलच्या नेटवर्कवर पडेल दबाव

वोडाफोन आयडिया दिवाळखोरीत गेल्यास ग्राहकांमध्ये देखील भिती पसरू शकते. अशा स्थितीमध्ये वीआयचे ग्राहक रिलायन्स जिओ, एअरटेल आणि बीएसएनएल/एमटीएनएलकडे वळण्याची शक्यता आहे. मात्र, अचानक लाखो ग्राहकांचा ओघाने नेटवर्क कॅपिसिटीसंदर्भात समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांना मिळणाऱ्या सुविधांवर नक्कीच परिणाम होईल. एकाच वेळी असंख्य नवीन ग्राहक जोडले गेल्याने सध्या मिळणाऱ्या ग्राहकांच्या सेवांवर देखील परिणाम पाहायला मिळेल. ग्राहकांकडे केवळ दोनच कंपन्यांचा पर्याय असेल.



​मर्यादित कंपन्यांची मक्तेदारी
​मर्यादित कंपन्यांची मक्तेदारी

वोडाफोन आयडिया बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने भारतीय टेलिकॉम बाजारात केवळ रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या दोनच मोठ्या कंपन्या राहतील. यामुळे केवळ या दोन कंपन्यांची मक्तेदारीच असेल. यामुळे ग्राहकांसमोर केवळ दोनच कंपन्याचा पर्याय असेल, जी चांगली गोष्ट नाही.

सेवांवर होणार परिणाम

वोडाफोन आयडिया बंद पडल्यास टेलिकॉम इंफ्रास्ट्रक्चरसाठी येणारा खर्च एअरटेल आणि जिओ या कंपन्यावर पडेल. यामुळे दोन्ही कंपन्यांच्या ऑपरेशन्सचा खर्च देखील वाढेल व टेक्नोलॉजीमधील गुंतवणुकीवर देखील परिणाम होईल.



​मोबाइल रिचार्जच्या किंमती वाढतील
​मोबाइल रिचार्जच्या किंमती वाढतील

टेलिकॉम क्षेत्र आधीपासून आर्थिक संकटात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये टेलिकॉम क्षेत्र मोठ्या नुकसानीत आहे. गेल्या काही वर्षात ऑपरेशन्सचा अर्थात सुविधा देण्याचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, टेलिकॉम कंपन्यांना अधिक खर्च झेपू शकत नाही. थोडक्यात, कोणताही इतर खर्च वाढल्यास याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे. कंपन्यांचा इतर खर्च वाढल्यास हा खर्च एकप्रकारे ग्राहकांकडूनच वसूल केला जाईल व याचा परिणाम म्हणजे मोबाइल रिचार्जच्या किंमती वाढतील.



​५जी लाँचवर होणार परिणाम
​५जी लाँचवर होणार परिणाम

गेल्या काही महिन्यात भारतात ५जी नेटवर्क उपलब्ध होणार असल्याच्या चर्चा आहेत. टेलिकॉम कंपन्या विविध शहरांमध्ये ५जी नेटवर्कचे टेस्टिंग देखील करत आहे. मात्र, ५जी नेटवर्कसाठी टेलिकॉम कंपन्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. वोडाफोन आयडिया या दिवाळखोरीत केल्यास ५जी लाँचवर देखील याचा मोठा परिणाम होईल. वोडाफोन बंद झाल्यास अचानक झालेल्या ग्राहकांच्या वाढीचा परिणाम इतर दोन कंपन्यांवर होईल व अपग्रेड करण्याविषयी दुसरा कोणताच परिणाम नसेल. यासाठी फंड डायव्हर्जन करावे लागेल.



​२जी ग्राहकांवर होणार परिणाम
​२जी ग्राहकांवर होणार परिणाम

वोडाफोन आयडियाच्या २७० मिलियन सबस्क्राइबर्स पैकी १४०-१५० मिलियन ग्राहक हे २जी नेटवर्क वापरतात. वोडाफोन आयडियाला दिवाळखोरीचा सामना करावा लागल्यास सर्वाधिक फटका कंपनीच्या २जी वापरणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. यामुळे कंपन्यांना इतर कंपन्यांकडे जावे लागेल व त्यांना रिचार्जसाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील. वीआय बंद झाल्यास २जी ग्राहकांसमोर केवळ दोनच पर्याय असतील. ग्राहकांना इतर नेटवर्ककडे असलेले अधिक किंमतीचे रिचार्ज करावे लागतील किंवा नवीन ४जी फोन्स खरेदी करावे लागतील. कारण रिलायन्स जिओ २जी सेवा देत नाही.





from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sHLsIa