मुंबई- छोट्या पडद्यावर गाजणारा मराठमोळा कार्यक्रम '' सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. या आठवड्यात भरलेल्या बिग बॉसच्या चावडीवर यांनी अनेक स्पर्धकांची शाळा घेतली. यात विशाल आणि सोनालीमध्ये झालेल्या वाद देखील पुन्हा उफाळून आला. सोनालीने लग्न ठरल्याचं लपवून ठेवल्याने दुखावलेल्या विशालने सोनालीवर अनेक आरोप केले. परंतु, सोनाली तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असताना तिला रोखणाऱ्या महेश मांजरेकर यांच्यावर नेटकरी चांगलेच भडकले आहेत. चावडीवर विशाल आणि सोनाली यांच्यातील वादाची ठिणगी चांगलीच पेटली होती. त्यात विशाल सोनालीवर अनेक आरोप करत होता. सोनालीने आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचं देखील त्याने म्हंटलं. परंतु, विशालच्या आरोपांवर सोनाली जेव्हा स्पष्टीकरण देत होती तेव्हा मांजरेकर तिला अडवत होते. तुला नंतर बोलायला मिळेल असं सांगत होते. त्यामुळे सोनाली तिची बाजू मांडू शकली नाही. त्यामुळे सगळ्यांना सोनाली चुकीची आहे असं दिसलं. त्यामुळेच नेटकरी मांजरेकरांवर प्रचंड चिडले आहेत. सोनालीला बोलूचं दिलं नसल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. अनेक नेटकऱ्यांच्या मते, विशालने सोनालीवर आरोप केले तेव्हा एका एका आरोपाचं खंडन करण्याची संधी सोनालीला मिळायला हवी होती. मात्र मांजरेकर सोनालीवर प्रचंड भडकले आणि तिला घराबाहेर काढण्याची धमकी दिली. अनेकदा तिला दरवाज्याबाहेर आणि बेडरूममध्ये उभं राहायला लागेल असं सांगण्यात आलं. यामुळे सोनाली तिची बाजू मांडू शकली नाही आणि ती सगळ्यांसमोर चुकीची ठरली असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. अनेकांना मांजरेकरांचं सोनालीसोबतचं वागणं पटलेलं नाही. विशालची देखील यात तेवढीच चूक होती मुलीलाच का चुकीचं ठरवलं जातंय असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे. तर विशालचे चाहते जास्त आहेत त्यामुळे मांजरेकरांनी सोनालीला टारगेट केलं, असंही नेटकरी म्हणत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3p5IHzg