मुंबई- लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आणि अभिनेता यांचा '' चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्यांदाच सलमान आणि आयुष मोठ्या पडद्यावर एकत्र झळकत आहेत. आतापर्यंत सलमानच्या चाहत्यांना एकच प्रश्न सतावत आला आहे तो म्हणजे सलमानच्या लग्नाचा. चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान आयुषला देखील सलमानच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आयुषने सलमान लग्न का करत याचा खुलासा केला. सलमानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास त्याचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यामुळेच सलमानच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यावर आयुष म्हणाला, 'सलमान आणि मी लग्न या विषयावर जास्त बोलत नाही. लग्न हा विषय सलमानने त्याच्या आयुष्यातून काढून टाकलाय. सलमान जसं त्याचं आयुष्य जगतोय त्यावरून मला वाटतं की त्याच्याकडे लग्न करायला वेळचं नाहीये. सलमान जसा आहे तसाच खूप आनंदात आहे. लग्नाचा निर्णय त्याचा आहे आणि तो सलमान स्वतः घेईल. कुणाला तरी दाखवायचं आहे म्हणून सलमान लग्न करणार नाही.' सलमानच्या रोजच्या आयुष्याबद्दल बोलताना आयुष म्हणाला, 'सलमान त्याचं आयुष्य अत्यंत साध्या पद्धतीने जगतो. तुम्ही सलमानच्या फोनबद्दल चौकशी कराल तर तुम्हाला कळेल की तो दोन वर्ष जुना फोन वापरतोय. त्याला गॅजेट्समध्ये फारसा रस नाहीये. ब्रॅण्डेड कपडे, गाड्या यामध्येही तो फारसा रमत नाही. जर तुम्ही सलमानला दोन तास एकटं सोडलं तर तो एखादा चित्रपट पाहण्यामध्ये त्याचा वेळ घालवेल. त्याला चित्रपट पाहण्याची आवड आहे. तो अत्यंत सध्या पद्धतीने जगणारा माणूस आहे.' यापूर्वी महेश मांजरेकर यांनीदेखील सलमानबद्दल बोलताना त्याला उंची राहणीमान पसंत नसल्याचं म्हटलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3D0YGnd