मुंबई- 'माझ्या नवऱ्याची बायको' या गाजलेल्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री हिने नुकतीच याच्यासोबत लग्नगाठ बांधली. गोव्याच्या किनाऱ्यावर त्यांचा छोटेखानी असा विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याला त्यांचे जवळचे नातेवाईक आणि काही खास पाहुणे उपस्थित होते. परंतु, आता लग्नानंतर रसिका पतीसोबत परदेशी जाणार का, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रसिकाने चाहत्यांच्या या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. सध्या रसिका तिच्या सासरी म्हणजे औरंगाबाद येथे आहे. टाइम्स ऑफ इंडियाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रसिकाने तिच्या लग्नाबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला. रसिका म्हणाली, 'आदित्य आणि मला असं छोटंसं लग्न हवं होतं. ज्यात मी आणि आदी खूप मजा करू शकू. त्यामुळे मी समुद्रकिनारी लग्न करण्याचा विचार केला. आमच्या लग्नात आलेला प्रत्येक पाहुणा त्याच्या कामापासून आणि त्यांच्या रोजच्या धावपळीपासून दूर राहावा यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. आम्ही अगदी पाय दुःखेपर्यंत नाचलो. ही आमची लग्नानंतरची पहिली दिवाळी त्यामुळे ती आमच्यासाठी खास आहे. मी माझ्या बाबांकडून आणि आदित्यकडून भेटवस्तू घेणार आहे.' रसिका पुढे म्हणाली, 'आम्ही आमच्या कामाबद्दल खूप प्रामाणिक आहोत. आम्ही दोघेही आपापल्या कामावर परतणार आहोत. त्यामुळे मी इथेच राहणार आहे आणि आदित्य परदेशी जाणार आहे. आम्ही वेगवेगळ्या देशात राहणार हे खरं आहे. पण आम्ही हे सगळं जमवून घेऊ. आम्ही दूर राहूनही मनाने एकमेकांसोबत राहू. सध्या मी सणांचा भरपूर आनंद घेते आहेत. या नंतर आम्हाला आपापल्या कामावर परतायचं आहे. आम्ही पाडव्यानंतर पुन्हा ठाण्याला परतणार आहोत. मला सात तारखेपासून काम सुरू करायचं आहे. त्यामुळे मी या सणाचा मन भरून आनंद घेत आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3o3bF1U