मुंबई- प्रेक्षकांची अत्यंत लाडकी मालिका '' पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकायला सज्ज झाली आहे. स्वीटूचं लग्न मोहितसोबत झाल्याने मालिकेचे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले होते. स्वीटू आणि ओंकार यांचं लग्न न दाखवल्याने मालिका सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली होती. सगळ्यांची आवडती मालिका अचानक प्रेक्षकांची नावडती झाली होती. परंतु, आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना अपेक्षित गोष्ट मालिकेत घडणार आहे. ओमकारला स्वीटू आणि मोहित यांच्यातील नात्याचं सत्य समजणार आहे. ओमकार स्वीटूच्या बाबांना वाचवायला गेला असताना स्वीटू आणि मोहित यांचं लग्न होतं. परंतु, स्वीटू मोहितला आपल्यात पती-पत्नीचं कोणतंही नातं नसेल असं सांगत स्वतःपासून दूर ठेवते. तर स्वीटूने आपलं प्रेम विसरून मोहितचा स्वीकार करावा यासाठी ओमकार वाईट बनून खानविलकरांच्या घरात परततो. परंतु, ओमकार त्याच्या प्रयत्नात यशस्वी होत नाही कारण स्वीटू अजूनही ओमकारवर प्रेम करते. मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे आता ओमकार स्वीटूच्या सासरी जाणार आहे. तिथे ओमकारला स्वीटू आणि मोहितच्या नात्याबद्दल कळणार आहे. त्यानंतर स्वीटू ओमकारला त्याच्या प्रयत्नांबद्दल जाब विचारणार आहे. ओमकार आणि स्वीटू यांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मालिकेची कथा आता वेगळं वळण घेणार असल्याने प्रेक्षक मात्र आनंदले आहेत. आता मालिकेत पुढे काय होणार? ओमकार नेमका काय निर्णय घेणार? स्वीटू आणि ओमकार एकत्र येणार का? पुन्हा मालविका काही खोडा घालणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bFTzNN