मुंबई: अभिनेत्री आणि अभिनेता यांचं लग्ना आता काही दिवसांवर आलं आहे. लग्नाची तयारी जोरात सुरू असून प्रत्येक लहान गोष्ट विचार करून केली जात आहे. लग्नाला दोघांच्या कुटुंबियांसोबत मोजकी पाहुणे मंडळी उपस्थित राहणार आहेत. लवकरच दोघंही राजस्थानला रवाना होणार आहे. कतरिना आणि विकीच्या लग्नासोबत त्याचा खर्चही चर्चेचा विषय ठरतोय. पाण्यासारखा पैसा या लग्नासाठी खर्च केला जाणार आहे. व्हिआयपींसाठी राहण्याची विशेष व्यवस्था, सुरक्षेसाठी १०० बाउन्सर अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत. असं असलं तरी पाहुण्यांची संख्या मात्र मोजकीच आहे. कोटींवर खर्च असला तरी या विवाहसोहळ्याला केवळ १२० पाहुणे येणार आहे. ज्यांचं लसीकरण पूर्ण झालं आहे त्याच पाहुण्यांना यादीच स्थान देण्यात आलं आहे. तसंच लसीकरण झालं असलं तरी आरटीपीसीआर चाचणी पाहुण्यांसाठी बंधनकारक करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विकी आणि कतरिना राजस्थानमधील सिक्स सेन्स किल्ल्यातील रिसॉर्टमध्ये लग्न करणार आहेत. या दोघांचा लग्नसोहळा ७ ते ९ डिसेंबरमध्ये होणार आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी लग्न सोहळ्याबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. लग्नसोहळ्याची तारीख, ठिकाण, निमंत्रितांची यादी याबाबत खूपच दक्षता बाळगली आहे. इतकेच नाही तर लग्न सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळं कतरिना आणि विकी यांनी प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या पावलांवर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31qspsD