Full Width(True/False)

सलमानच्या आई- वडिलांना लग्नात बोलवू इच्छित होती कतरिना!

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता यांच्या लग्नाने संपूर्ण बॉलिवूडमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सोशल मीडियावर देखील चाहते आनंद व्यक्त करत आहेत. विकी आणि कतरिना राजस्थानमधील सवाई माधवपूर मधील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा या हॉटेलमध्ये शाही पद्धतीने विवाह करणार आहेत. या विवाहसोहळ्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. परंतु, कतरिनाच्या मनातील एक इच्छा मात्र अजूनही अपूर्ण राहिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कतरिनाला तिच्या लग्नात बॉलिवूड अभिनेता याच्या आई- वडिलांना देखील आलेलं पाहायचं होतं. मात्र एका कारणामुळे कतरिनाची ही इच्छा पूर्ण होणार नाहीये. एका मुलाखतीत सलमानची बहीण अर्पिता खान हिने तिला कतरिनाच्या लग्नाचं आमंत्रण आलं नसल्याचं म्हटलं होतं. पण नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, कतरीना हिची इच्छा होती की सलमान आणि त्याचे आई- वडीलदेखील या विवाहसोहळ्याला उपस्थित राहावे. सलमानच्या आई- वडिलांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा. सलमानच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे कतरिना सोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे कतरिनाने त्यांना लग्नाचं आमंत्रणही देऊ केलं होतं. मात्र सलमानचे वडील सलीम खान आणि आई सलमा त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे प्रवास करू शकत नसल्याने या विवाहासाठी उपस्थित राहू शकणार नाही. तर सलमानही त्याच्या द- बँग टूर साठी ८ तारखेला प्रवासासाठी निघणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कतरिनाच्या विवाहासाठी सलमानची बहीण अर्पिता तिचा पती आयुष शर्मासोबत उपस्थित राहू शकते. तर अलवीरा खान देखील पती अतुल अग्निहोत्री सोबत लग्नाला हजेरी लावू शकते. सध्या विकी आणि कतरिनाच्या लग्नसोहळ्यातील कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे. या विवाहसोहळ्याला नेहा धूपिया, अंगद बेदी, शर्वरी वाघ, कबीर खान, मिनी माथुर, गुरदास मान अशा अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/303Qjtq