मुंबई- '' मालिकेने फार कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेत दाखवण्यात येणारी एक आगळी वेगळी कहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. स्वीटू आणि ओमचं प्रेम प्रेक्षकांना भावलं. मालविकाने अनेक अडथळे आणल्यानंतरही ओम आणि स्वीटू यांचं होणारं लग्न पाहून प्रेक्षक सुखावले होते. मात्र मालिकेत आलेल्या ट्विस्टने प्रेक्षकांचा भ्रमनिरास झाला आणि मालिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली. आता पुन्हा एकदा मालिकेत ओम आणि स्वीटू यांच्यातील अंतर कमी होताना दाखवण्यात आलं आहे. मात्र अचानक आलेल्या या ट्विस्टमुळे मालिका निरोप घेणार की काय, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत अचानक आलेल्या ट्विस्टमुळे प्रेक्षक गोंधळले आहेत. सध्या मालिकेत सुरू असलेल्या कथेनुसार, मोहित आणि मालविकाचं सत्य सगळ्यांसमोर आलं आहे. चिन्याच्या अपघातासाठी मालविका जबाबदार आहे आणि दादा साळवी यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारी मालविका असल्याचं सत्य समजल्याने स्वीटू मालविकाला त्याचा जाब विचारते. त्यानंतर पोलीस मालविकाला अटक करत असल्याचं मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. मालिकेत आलेल्या या ट्विस्टमुळे प्रेक्षक पुन्हा एकदा सुखावले आहेत. मात्र या पुढे नक्की काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. मालविका गेल्यानंतर आता स्वीटू आणि ओम एकत्र येणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. यासोबतच जर स्वीटू आणि ओम एकत्र आले, त्यांचं लग्न झालं तर मालिका पुढे कोणतं वळण घेणार? की मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असा प्रश्नदेखील प्रेक्षकांसमोर आहे. आता मालिकेत पुढे काय होणार हे लवकरचं कळेल मात्र सध्या प्रेक्षक स्वीटू आणि ओमच्या विवाह सोहळ्यासाठी उत्सुक असल्याचं चित्र आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3DpRWzi