Full Width(True/False)

मिलिंद गवळीनं सोशल मीडियावरून स्वतःवरच केली टीका

मुंबई : छोट्या पडद्यावरील '' ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली आहे. सध्या मालिकेचे कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आले आहे. मालिकेतील नायिका अरुंधतीच्या आयुष्यात तिच्या कॉलेजमधील जुना मित्र आशुतोष केळकर आल्यामुळे एक वादळ निर्माण झालं आहे. आशुतोषच्या येण्यामुळे अरुंधतीचा नवरा अनिरुद्धला असुरक्षित वाटू लागलंय आणि त्यामुळे तो सतत अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यावर संशय घेताना दिसतो. परंतु अरुंधती खंबीरपणे ही सर्व परिस्थिती हाताळत अनिरुद्धला त्याची जागा दाखवून देते. मालिकेत नव्याने आलेल्या आशुतोष केळकर या पात्राबद्दल अनिरुद्ध अर्थात यांनी एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट लिहिताना त्यांनी आशुतोषची भूमिका साकारणाऱ्या ओंकार गोवर्धनचं कौतुक केलं आहे. त्याचसोबत मालिकेतील पात्रांची निवड करणाऱ्या मंडळींचेही भरभरून कौतुक केले आहे. मिलिंद गवळी यांनी काय लिहिलं अनिरुद्ध देशमुखची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळी यांनी मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला. या प्रोमोत देशमुखांच्या घरी आलेल्या आशुतोष केळकर आणि अनिरुद्ध देशमुख यांच्यात शाब्दिक वाद होताना दिसत आहे. या वादामध्ये आशुतोष अनिरुद्धला निरुत्तर करताना दिसत आहे. हा प्रोमो सोबत मिलिंद यांनी एक नोट शेअर केली आहे. ' यश नेहमीच सहज मिळतं असं नाही.' किती महत्त्वाचं वाक्य आशुतोष केळकर म्हणतो. अनिरुद्धसारख्या माणसांकडे आशुतोष केळकर यांच्यासारख्या व्यक्तींच्या प्रश्नांची उत्तरं असतात का? आशुतोषसारखी जी माणसं असतात, ती साधी, सरळ प्रामाणिक असतात. त्यांना आनंदी आयुष्य जगणं किती सोपं जातं. आयुष्याच्या सगळ्या टप्प्यांवर यशस्वी होत जातात आणि त्या यशाचा त्यांना गर्व नसतो. आशुतोष केळकर असाच एक गोड माणूस आणि अशी माणसं आपल्याला हवीहवीशी वाटतात. ही अशी माणसं अनिरुद्धसारख्यांना नाही आवडत. कारण त्यांच्यापेक्षा ते सुपिरियर असतात सगळ्याच बाबतीत, तेच अनिरुद्धला सहन होत नाही...' मिलिंद गवळी या पोस्टमध्ये पुढे लिहितात की, ' खरेच किती कमी दिवसांत आशुतोष ही व्यक्तिरेखा लोकांची आवडती झाली. खरंतर मलाही ती व्यक्तिरेखा खूपच आवडते. ही भूमिका साकारणारा ओमकार गोवर्धन हा पण खूप आवडतो. तोही अगदी आशुतोषसारखाच आहे. कधी कधी कलाकार आणि ती भूमिका अगदी एकरूप होतात. तसाच आशुतोषच्या भूमिकेत ओमकार चपखल बसला. जसा अविनाशच्या कॅरेक्टरमध्ये शंतनु मोघे फिट बसला. 'मालिकेचं कास्टिंग डिपार्टमेंट म्हणजेच नमिता वर्तक, रवी कर्मारकर यांचं खरोखर कौतुकच आहे. एवढ्या सगळ्या कलाकारांमध्ये बरोबर त्या भूमिकेला साजेसा कलाकार शोधायचा, किती कठीण काम आहे. शंतनु अतिशय गोड, प्रेमळ स्वभावाचा म्हणजे अविनाशसारखा. ओमकार गोवर्धनचंही काहीसं तसंच आहे.' 'माझ्या मनात कधी कधी विचार येतो की माझी निवड करताना म्हणजे अनिरुद्ध देशमुखसारख्या व्यक्तिरेखेसाठी कास्टिंग करतात त्यांना मिलिंद गवळी सुचला. याचा अर्थ माझ्यामध्ये अनिरुद्ध देशमुख त्यांना दिसला... नक्कीच दिसला असणार... उर्मट, माजोरडा, स्वार्थी... बापरे हे सगळे गुण माझ्यात आहेत? त्यांना ते दिसले? मिलिंद गवळी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3IzcMjI