Full Width(True/False)

Video- अक्षय कुमारनं विकी- कतरिनाच्या लग्नावर केली कमेन्ट

मुंबई : बॉलिवूडमधील स्टार कपल म्हणून कतरिना कैफ- यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. दोघांनी ९ डिसेंबर रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे राजेशाही थाटात लग्न केलं. त्यांचा लग्नसोहळा आजही चर्चेचा विषय आहे. दोघांनी लग्नाबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. सातत्याने मीडियामध्ये त्यांच्या लग्नाच्या बातम्या येऊनही त्यांनी यावर कोणतंही भाष्य केलं नव्हतं. या दोघांच्या लग्नावर अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता या दोघांच्या लग्नावर अभिनेता अक्षय कुमारने देखील एक मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. '' मध्ये सहभागी झाला होता. तो या कार्यक्रमात त्याच्या आगामी 'अतरंगी रे' सिनेमाच्या प्रमोशनसाठी सारा अली खानसोबत आला होता. कार्यक्रमात तो आणि कीकू शारदा दोघेजण कतरिना आणि विकी यांच्या लग्नाबद्दल बोलत होते. त्यावेळी किकू अक्षयला सांगतो की, 'मी आताच राजस्थानमध्ये हायप्रोफाईल लग्न सोहळ्याला जाऊन आलो.' किकू पुढे सांगतो की, 'तुमचा कुणाचाही माझ्यावर विश्वास बसणार नाही. परंतु मी माझ्या उभ्या आयुष्यात अशा प्रकारचा लग्न सोहळा पाहिलेला नाही.' त्यावर अक्षय त्याला म्हणतो 'असं का?' त्याला उत्तर देताना किकू सांगतो की, 'कारण त्यांनी मला लग्न पाहूच दिले नाही. परंतु सर्व कौशल मंगल झाले.' किकूचं बोलणं ऐकल्यानंतर अक्षय कुमार त्याला कतरिनाबद्दल विचारतो. त्याने विचारलं की, 'तर त्या लग्न सोहळ्यात जाऊन 'किटकॅट' तर नक्कीच खाऊन आला असशील ना.' अक्षयच्या या वक्तव्यावर सारा अली खान पासून हसली. दरम्यान, अक्षय कुमार, सारा अली खान, धनुष यांचा अतरंगी रे हा सिनेमा २४ डिसेंबर रोजी डिस्नी हॉटस्टार या ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. या सिनेमात अक्षय एका जादूगाराची भूमिका साकारत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3H5fFHp