मुंबई:अभिनेता सुशांतसिंह राजपूत यानं या जगातून घेतलेल्या अकाली एक्झिटमुळं अनेकांना मोठा धक्का बसला आहे. त्याचे मित्र आणि कुटुंबिय या धक्क्यातून अद्यापही सावरले नाही. सुशांतच्या जवळच्या काही मित्र मंडळींना सोशल मीडियावर भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे ही देखील पुन्हा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या नात्याची चर्चा सुरू आहे. अंकितासोबत ब्रेकअप झालं नसतं तर सुशांतनं हे पाऊल उचलंच नसतं असं अनेकांनी म्हटलं आहे. पवित्र रिश्ता या मालिकेदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर तब्बल सहा वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळं सर्वांनाच धक्का बसला होता. परंतु दोघांनी नंतर याबद्दल बोलणं सोडून दिलं. असं असलं तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात असल्याचं दिसून येत होतं. ब्रेकअपनंतरही सुशांतनं अंकिताला तिच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटासाठी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या होत्या. अंकितानं कंगना रनौट हिच्या 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचं पोस्ट अंकितानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं होतं. त्यानंतर सुशांतनं तिला चित्रपटासाठी शुभेच्छा देत कौतुक केलं होतं. अंकितानंही त्याच्या शुभेच्छांचा स्विकार करत त्याला रिप्लाय दिला होता. त्या दोघांच्या या संवादाचे स्क्रिन शॉर्ट्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुशांतच्या निधनानंतर अंकिता अद्यापही या धक्क्यातून सावरली नाहीए. 'पवित्र रिश्ता' या मालिकेत सुशांत आणि अंकिता एकत्र काम करत होते. त्यानंतर सुशांतनं मालिका सोडली आणि तो बॉलिवूडमध्ये गेला. तिथं स्थिरावण्यासाठी त्यानं जोरदार प्रयत्न सुरू केले. या दरम्यानच दोघांनी प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर २०११मध्ये एका डान्सरिअॅलिटी शोमध्ये सुशांतनं अंकिताला मागणी घातली होती. तिनंही त्याला होकार दिला. आपण लवकरच लग्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. पण काही दिवसानंतर एका पार्टीमध्ये अंकितानं सुशांतला एक सणसणीत थोबाडीत दिल्याच्या बातम्यांनी मध्ये खळबळ उडवून दिली होती. पण त्यानंतर दोघांनीही या घटनेचा इन्कार केला होता‘आमच्यात असं काही झालेलंच नाही. आम्ही पूर्वीसारखेच एकमेकांच्या गाढ प्रेमात आहोत. आमच्याविषयी असं काहीतरी छापणाऱ्या लोकांची तर आम्हाला कीवच येते.’असं या दोघांचं म्हणणं होतं. पण काही दिवसांतच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3duvBn9