मुंबई : '' मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहेत. मालिकेत काही बदल झाल्याचंही प्रेक्षकांना दिसणार आहे. या मालिकेत शनायाची भूमिका करणारी अभिनेत्री पुन्हा एकदा म्हणूनच मालिकेमध्ये एंट्री घेतेय. राधिका-गुरुनाथ आणि शनाया या तिघांच्या गोष्टीनं सुरू झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका तुफान लोकप्रिय ठरली होती. या मालिकेच्या सुरुवातीपासूनच शनायाच्या भूमिकेचे नखरे, तिचा मॅडनेस, तिची फॅशन प्रेक्षकांना आवडलं होतं. अभिनेत्री रसिका सुनीलच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळत होती. पण, रसिकाला मध्यंतरी शिक्षणासाठी परदेशी जावं लागल्यानं मालिकेच्या एका टप्प्यावर शनायाचा चेहरा बदलला होता. तिच्या जागी अभिनेत्री शनाया म्हणून मालिकेत आली. तिच्या अभिनयाचंही कौतुक झालं. पण, आता प्रकृती अस्वास्थाच्या कारणास्तव ईशानं ही मालिका सोडल्याचं कळतंय. तर दुसरीकडे आता मूळची शनाया, म्हणजेच रसिका सुनील मालिकेत परतणार आहे. भूमिका सोडल्यानंतर मध्ये दोन वर्षे गेली आहेत असं सेटवर पुन्हा आल्यावर जाणवलंच नाही. शनाया ही भूमिका पुन्हा साकारताना; ज्या जुन्या गोष्टी लक्षात घेऊन मी पूर्वी काम करायचे तसंच आताही काम करतेय. संपूर्ण टीमशी आधीपासूनच बाँडिंग असल्यामुळे पुन्हा भूमिकेत शिरणं अवघड गेलं नाही. भूमिकेसाठी पुन्हा विचारणा झाल्यावर अगदी सहज मी ती स्वीकारली. लॉकडाउनच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येताना आनंद होतोय. - रसिका सुनील दरम्यान, 'माझ्या नवऱ्याची बायको'चं चित्रीकरण आता नाशिकमध्ये होणार आहे. तूर्तास पाच-सहा मुख्य कलाकारांसह मालिकेचं शूटिंग सुरू होणार आहे.यापूर्वी हे शूटिंग ठाण्याला होत होतं. पण, ठाण्यातल्या ज्या इमारतीमध्ये या मालिकेचं चित्रीकरण व्हायचं तिथं आता परवानगी मिळत नाहीय. त्यामुळं हे शूटिंग मुंबईबाहेर म्हणजेच नाशिकजवळच्या इगतपुरीला हलवण्यात आलं आहे. या भागात एक संपूर्ण रिसॉर्ट भाड्यानं घेण्यात आलं असून, कलाकारांसह मालिकेची संपूर्ण टीम सध्या तिथेच राहून चित्रीकरण करणार आहे. सोमवारपासून मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली असून, एपिसोड्सचं एडिटिंगचं कामही तिथेच होणार असल्याचं कळतंय. त्याबरोबरच मुंबई, ठाण्यात 'भाभीजी घर पर है', 'मोलकरीण बाई' यासारख्या अनेक हिंदी-मराठी मालिकांच्या चित्रीकरणालादेखील सुरुवात झाली आहे. तसंच ईशानं अचानक मालिका सोडण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ईशानं एक व्हिडिओ शेअर केला आहे. ईशानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत मालिका सोडण्याचा निर्णय आणि कारण चाहत्यांपर्यंत पोहोचवलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2BFbgPp