Full Width(True/False)

स्टारने लॉकडाउनमध्ये केला साखरपुडा, या तारखेला होणार लग्न

तेलंगणा- टॉलिवूड स्टार आणि त्याची गर्लफ्रेंड अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या एप्रिल महिन्यात त्यांचं लग्नही होणार होतं. पण लॉकडाउनमुळे त्यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं. पण नुकताच या जोडप्याने साखरपुडा पार पाडला असून येत्या २६ जुलै रोजी हे कपल लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या सोशल मीडियावर दोघांच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल होत आहेत. नितीन आणि शालिनीने एकमेकांना अंगठी घातल्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. घरातील मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत साखरपुड्याचा सोहळा पार पडला. गेल्या आठ वर्षांपासून नितीन आणि शालिनी एकमेकांना डेट करत आहेत. या वर्षी एप्रिल महिन्यात दोघांचा साखरपुडा आणि लग्न होणार होतं. पण करोना व्हायरसच्या कारणांनी लग्न पुढे ढकलण्यात आलं. आताही सोशल डिस्टन्सिंग आणि सुरक्षेच्या दृष्टीने २६ जुलैला होणाऱ्या लग्नात फार कमी लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहं. फलकनुमा पॅलेसमध्ये लग्न हैदराबादमधील हॉटेलमध्ये नितीन आणि शालिनी राजेशाही थाटात लग्न करणार आहेत. करोना व्हायरसमुळे लग्नाला फक्त जवळच्या नातेवाईकांना आणि काही मित्र- मंडळींना आमंत्रण देण्यात आलं आहे. नितीनने तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर आणि त्याचा आवडता अभिनेता पवन कल्याण यांना लग्नाचं आमंत्रण दिलं आहे. लग्नात करोनाशी निगडीत सर्व नियम आणि अटींचं पालन करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच सोशल डिस्टन्सिंगचंही योग्य प्रकारे पालन केलं जाईल असं नितीनने सांगितलं. शालिनीने यूकेमधून बिझनेस मॅनेजमेन्टचं शिक्षण घेतलं आहे. तर नितीनने त्याच्या करिअरमध्ये ५० हून अधिक सिनेमांत काम केलं आहे. २००२ मध्ये त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली. 'श्रीनिवास कल्याणम' आणि 'चल मोहन रंगा' या सिनेमातील त्याच्या अभिनयासाठी नितीन विशेष ओळखला जातो.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2OMQsYT