Full Width(True/False)

प्रेक्षकांची 'ही' आवडती मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

मुंबई:'' या मालिकेनं अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला, तसंच या दुसऱ्या सीझनलाही प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. पण, आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतंय. ही मालिका एका निर्णायक वळणावर आली आहे. मालिकेच्या चित्रीकरणाला सावंतवाडीमध्ये सुरुवात झाली आहे. नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, शेवंताच्या लग्नाची चर्चा आहे.त्याबरोबर काही दिवसांतच ही मालिका गुंडाळली जाणार असल्याची चर्चा आहे. शेवंतानं नाईकांशी लग्न करून नाईकांच्या वाड्यात प्रवेश केला आहे. शेवंताचं पुढे काय होणार याचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल. 'अण्णा नाईकांशी ती लग्न करतेय. पण, तिला नाईकांच्या वाड्यात प्रवेश मिळेल की नाही किंवा त्यामागेही अण्णांचं कारस्थान आहे की नेमकं काय, हे मालिकेच्या नव्या भागांमध्ये पाहायला मिळेल. मालिकेचे नवे भाग लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहेत. . लॉकडाउनच्या दिवसात मालिकेचं चित्रीकरण बंद असल्यामुळे प्रेक्षकांना मालिकेत पुढे काय होणार हे कळत नव्हतं. इतर मालिका सुरू झाल्या, तरी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली नव्हती. पण, आता मालिकेच्या चित्रीकरणाला सावंतवाडी येथे सुरुवात झाली असून, लवकरच मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अण्णा नाईकांशी लग्न करून नाईक वाड्यात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. इकडे माईनं घरात हळदी कुंकवाचा घाट घातलाय. इतक्यात हातात हिरवा चुडा, कपाळावर मोठ्ठं कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून शेवंता दारात उभी राहते, आणि सगळ्यांना धक्का बसतो. शेवंतानं तिचा पण पूर्ण केला आणि अण्णांशी लग्न केलं, पण तिला नाईकांच्या वाड्यात प्रवेश मिळणार की नाही हे येत्या भागांमध्ये कळेल. शेवंताचा लग्नाचा लुक प्रेक्षकांना आवडला असून, मालिकेचा शेवट कसा होतोय याची उत्सुकता नक्कीच असेल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eX3wWm