नवी दिल्लीः भारतात कोट्यवधी अॅक्टिव स्मार्टफोन युजर्स आहेत. त्यांच्यासाठी एक बॅड न्यूज आहे. सर्व टेलिकॉम कंपन्याचे रिचार्ज प्लान्स पुन्हा एकदा महाग होणार आहेत. करोना व्हायरस आणि लॉकडाऊन दरम्यान कंपन्यांसमोर अचानक हे आव्हान उभे ठाकले असून त्यांना टॅरिफ प्लान्स महाग करावे लागत आहेत. पुढील १२ ते १८ महिन्यात दोन वेळा महाग केले जाऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. वाचाः EY मध्ये इमर्जिंग मार्केट्स टेक्नोलॉजी, मीडिया अँड इंटरटेनमेंट अँड टेलिकम्यूनिकेशन्स (TMT) लीडर प्रशांत सिंघलने सांगितले की, टॅरिफ सध्याच्या परिस्थितीत महाग करतील की नाही. माहिती नाही. पण, काही वेळानंतर कंपन्या जरूर प्लान महाग करु शकतील. सिंघलने म्हटले आहे की, टॅरिफ महाग करणे गरजेचे आहे. टेलिकॉम आणि कंज्यूमर्सकडून करण्यात आलेला खर्च कमी आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यात टॅरिफ महाग करावे लागणार आहे. परंतु, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर केल्यास चांगले होईल. वाचाः १२ ते १८ महिन्यात दोनदा वाढ होणार प्रशांत यांनी सांगितले की, अफॉर्डेबल प्लान्सची गरज आहे. इकॉनोमिक परिस्थिती पाहता, प्लान महाग करणे चांगली आयडिया नाही. परंतु, पुढील १२ ते १८ महिन्यात दोन वेळा टॅरिफ महाग केला जाऊ शकतो. पुढील सहा महिन्यात एक वेळा कंपन्या आपल्या रिचार्ज प्लान महाग करतील. असे केल्यास मार्केटमध्ये त्यांना स्थीर राहण्यासाठी गरजेचे आहे. टेलिकॉम कंपन्यांकडून आता पर्यंत यावर काहीही बोलले गेले नाही. वाचाः म्हणून किंमत वाढवण्याची गरज टेलिकॉम कंपन्यांकडून गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात टॅरिफ प्लान्स महाग करण्यात आले होते. खूप साऱ्या ग्राहक व्यतिरिक्त मार्केटमध्ये राहणे गरजेच्या मिळकतीवर कस्टमर कमीच आहेत. त्यामुळेच सर्वच ऑपरेटर्स आपल्या प्लान्सच्या किंमतीत बदल करू शकते. गेल्या वेळी ४० टक्के वाढ करण्यात आली होती. आता कंपन्या दोन वेळा किंमती वाढवू शकतील, अशी माहिती समोर आली आहे. याप्रमाणे स्टेबल मार्केटच्या ट्रॅकवर परत येण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gtCtTJ